पुणे : रिपब्लिकन पक्ष असताना भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज नाही, असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात व्यक्त केले.
मनसेमुळे भाजपाचे नुकसान होऊ शकते. मनसेचा परप्रांतीयांना विरोधाचा मुद्दा भाजपाला राष्ट्रीय राजकारणात अडचणीचा आहे. त्यामुळे भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, असे त्यांनी सांगितले.
विविध कार्यक्रमांसाठी केंद्रीय मंत्री आठवले आज पुण्यात आले होते.यावेळी त्यांनी आम्ही असताना भाजपाला मनसेची गरज काय असा मुद्दा उपस्थित केला. राज्यात आणि पुण्यात आम्ही भाजपासोबत आहोत. आम्ही एकत्र असण्याच भाजपाला फायदा होत आहे. मनसेला सोबत घेतल्यास भाजपाचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता आहे,असे आठवले यांनी स्पष्ट केले.
येत्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्यात मनसे-भाजपा एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अर्थात ही चर्चा आहे. दोन्ही बाजूंकडून यावर अधिकृत कोणीही बोलत नाही. मात्र,मनसेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी भाजपाबरोबर जाण्याची तयारी दाखविली होती. त्यावर या वियात सध्या कुणी बोलू नका, असे आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने मनसेकडून हा विषय बंद करण्यात आला आहे.
राज्यातील राजकीय गणिते भाजपा-मनसे एकत्र आली तर बदलू शकतात. यामुळे या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्यावर आठवले यांनी घेतलेल्या भूमिकेला महत्व आहे.भाजपासोबत असलेल्या घटक पक्षात सध्या ‘आरपीआय’ हा महत्वाचा घटक आहे. मनसे या युतीत आली तर ‘आरपीआय’चे महत्व कमी होण्याची शक्यता असल्याने आठवले यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
Edited By : Umesh Ghongade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.