शेतकऱ्यांचा आवाज खासदार कोल्हेंनी थेट संसदेत पोचवला!

शरद पवार (Sharad Pawar) केंद्रीय कृषिमंत्री असताना केंद्र सरकार विशेष कृषी योजनेंतर्गत ७ टक्के विशेष अनुदान दिले जात होते.
dr. Amol Kolhe

dr. Amol Kolhe

sarkarnama

जुन्नर : संसदेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये लोकसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर मोदी सरकारला धारेवर धरले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. जागतिक बाजारपेठेत निर्धारित वेळेत द्राक्ष पोचण्यासाठी सर्व शिपिंग लाईन्सची बैठक बोलावून द्राक्षाच्या कन्टेनर्ससाठी जहाजांवर पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश द्यावेत, असेही कोल्हे म्हणाले.

<div class="paragraphs"><p>dr. Amol Kolhe</p></div>
कट समोर येताच केंद्रीय मंत्री पोचले मुलाच्या भेटीला थेट कारागृहात!

शिरूर लोकसभा मतदारसंघात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज कोल्हे यांनी संसदेत पोचवला. द्राक्ष निर्यातीसाठी शिपिंग कंपन्या कन्टेनर्ससाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देत नाहीत, परिणामी द्राक्ष वेळेत जागतिक बाजारपेठेत पोहचत नाही. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच यातून मार्ग काढण्याची मागणी केली. त्याचबरोबर मालवाहतूक दरात प्रचंड वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण आणण्याची तसेच प्रत्येक कन्टेनरमागे अडीच लक्ष रुपये अनुदान मोदी सरकारने जाहीर करावे, असेही कोल्हे म्हणाले.

<div class="paragraphs"><p>dr. Amol Kolhe</p></div>
शेतकऱ्यांना चिरडण्याचं पाप गंगेतील स्नानानं धुवून निघणार नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना केंद्र सरकार विशेष कृषी योजनेंतर्गत ७ टक्के विशेष अनुदान दिले जात होते. हे अनुदान ३ टक्क्यांवर आणण्यात आले आहे, याकडे लक्ष वेधून हे अनुदान वाढविण्याची मागणी कोल्हे यांनी केली. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याच्या मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करीत कोल्हे यांनी सध्या द्राक्ष हंगाम सहा महिने आहे तो ९ महिने होण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाची गरज आहे, त्यावरील आयात शुल्क कमी करण्याच्या मागणी बरोबरच केवळ युरोपची द्राक्षाची मागणी २५ लाख मेट्रिक टन असताना आपला देश केवळ १ लाख मेट्रिक टन द्राक्ष निर्यात करु शकतो या वास्तवाकडे संसदेचे लक्ष वेधले. द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कोल्हे यांनी या वेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com