'ज्याला घरची वाटी ओळखता येते त्याचा संसार सुखाचा होतो'

आपण घरी गेल्यावर बायकोशी दोन शब्द गोड बोलावं, कौतुक करावं, असा सल्ला केंद्रीय मंत्री कपिल पाटील (kapil Patil) यांनी दिला आहे.
Kapil Patil
Kapil PatilSarkarnama

पुणे : बाई तुला मी नमन करतो ऐवढे दिवस मला माहित नव्हतं तु आहेस म्हणुन माझा संसार चाललायं, असे नवऱ्याने आपल्या बायकोला बोलायला पाहिजे, असा पुरूषांना सल्ला दिला आहे खुद्द केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी. ते महिला दिनाच्या पुर्वसंधेला पुण्यातील जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके यांच्या नेतृवाखाली आयोजित भाजपाच्या (BJP) महिलांचा मेळाव्यात बोलत होते. यावेळी पाटलांनी पुरूषांनी बायकोशी कसे गोड बोलावे याबाबतचा किस्साही सांगितला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला होता.

Kapil Patil
वादग्रस्त वक्तव्यामुळे दानवे पुन्हा अडचणीत; नाभिक संघटना झाल्या आक्रमक

आम्ही पुरुष घरी गेल्यावर कधी बायकोचे कौतुक करत नाही. सारख्या कार्यालयातील कंटाळवाण्या गोष्टी सांगत असतो. मात्र आपण घरी गेल्यावर बायकोशी दोन शब्द गोड बोलावं, कौतुक करावं, आम्ही नेहमी म्हणतो आम्ही आहे म्हणुन संसार चालतो घरच्या लक्ष्मीचे कौतुक न करता शेजारणीचं कौतुकच करतो. हे पटवून देण्यासाठी पाटलांनी महिलांच्या मेळाव्यात एक किस्साही सांगितला. उपस्थित महिलांनी पाटलांनी सांगितलेल्या किस्याला टाळ्या वाजवून दादही दिली. यावेळी माजी मंत्री संजय बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी कॉग्रेस आमदार अतुल बेनके, भाजपा नेत्या आशा बुटके, देवराम लांडे, गणेश कवडे उपस्थीत होते.

Kapil Patil
फडणवीसांना राष्ट्रवादीच्या आमदारांची साथ; पोलीस अधिक्षकांवर कारवाईची गृहमंत्र्यांची घोषणा

पाटलांनी आपल्या भाषणातून पुरूष कसे आपल्या घरी जाऊन कामावरील गऱ्हाणे बायकोला सांगत असतो. त्यामुळे बायको वैतागते हे सांगितले. ते सांगण्यासाठी त्यांनी एका प्रवचनकाराच्या प्रवचनातला एक मजेशीर दृष्टांतही सांगितला.

एक ग्रामसेवक आपल्या बायकोच्या कटकटीला कंटाळलेला असतो. त्यावर त्या ग्रामसेवकाला बोयकोशी गोड बोलण्याचे आणि स्तुती करण्याचा सल्ला दिला जातो. त्या दिवशी तो कामावरून आपल्या घरी जातो आणि आपल्या बायकोला म्हणतो, बाई तुला मी नमन करतो ऐवढे दिवस मला माहित नव्हतं तु आहेस म्हणुन माझा संसार चाललाय. यानंतर बायकोनी जेवायला दिले, जेवतांना भाजीत मिठाचा खडा लागतो. मात्र बायकोला गोडच बोलायचे म्हणून तो काहीच बोलत नाही आणि म्हणतो की, आजची भाजी चांगली झाली मात्र, नेमकी त्या दिवशी ती भाजी शेजारणीने दिलेली असते. त्यावरून बायको टोमणा मारते आणि त्या ग्रामसेवकांची फजीती होते. त्यामुळे आपल्या घरची वाटी आपल्याला ओळखता आली पाहिजे. ज्या माणसाला आपल्या घरची वाटी ओळखता येते त्या माणसाचा संसार सुखाचा होतो. अन्यथा फजिती होते, असा सल्लाही पाटलांनी दिला. यावर उपस्थितांनी भरभरून दाद दिली आणि महिला मंडळीतून यावेळी एकच हश्या पिकला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com