पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासारख्या कलावंताने 'भीख में आझादी' या वक्तव्याचे समर्थन करणे म्हणजे केंद्र सरकारला खूष करून पद्मश्री मिळविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न दिसतो,’’ असा पलटवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी सोमवारी केला.
भीक मे आझादी या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वक्तव्याचे गोखलें यांनी पुण्यात एका कार्यक्रमात सर्थन केले होते.या पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले, ‘‘त्यावेळी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना फासावर लटकवले गेले, पण मोठ्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असे विक्रम गोखले यांचे म्हणणे आहे. असं वक्तव्य करून केंद्र सरकारमधील भाजप नेत्यांना खूश करून पुढच्या वर्षी पद्मश्री मिळेल यासाठी तर हा केविलवाणा प्रयत्न दिसत आहे.’’
जर स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी बलिदान केलं नसतं तर आज आपण स्वातंत्र्यासाठी लढताना दिसलो असतो. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदान ना भिकेची उपमा देऊन त्यांच्या भावनांशी खेळण्याचा कुठल्याही कलावंताला अधिकार नाही. ज्यावेळी स्वातंत्र्य लढा दिला गेला त्यावेळी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले जर त्यावेळेच्या आजादी भीक होती तर इतक्या स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्मा पत्करायची काय गरज होती? जर 2014 पूर्वी आजादि नसती तर गोखले कुणा एखादा इंग्रजांच्या घरी काम करताना दिसले असते ना की चित्रपटात भूमिका करताना.इतकं भान जरी ठेवले तरी विक्रम गोखले यांना आजादी ची परिभाषा लक्षात येईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.
गोखले यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास हा 2014 च्या किती तरी पूर्वीचा आहे त्यांच्या म्हणन्याप्रमाणे जर स्वातंत्र 2014 नंतर च आहे तर 2014 पूर्वीचा त्यांचा चित्रपटाचा यशवी प्रवास हा गुलामगिरीतला आहे का?आणि जर गुलामगिरीतला असेल तर त्यावेळेस त्यांचे स्वतंत्र साठी काय योगदान आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.
बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून सर्वांना समानतेची वागणूक आणि कायद्याने स्वातंत्र्य दिले आहे. असे जर नसते तर कंगना राणावत आणि विक्रम गोखले सारख्या कलावंतांना चित्रपट क्षेत्रात काम करता आल असतं का साधा प्रश्न उपस्थित होतो? म्हणून या दोघांना 2014 नंतर स्वतंत्र अपेक्षित आहे तर त्यांनी ज्या स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी 1947 पूर्वी खूप हाल-अपेष्टा व वेळप्रसंगी बलिदान दिला आहे अशा स्वातंत्र्यवीरांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.
Edited By : Umesh Ghongade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.