...ही तर पूर्व हवेली तालुक्याच्या निर्मितीची नांदी

विधानसभेत आमदार अशोक पवार व भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरिकीकरण, विकास पाहता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्यासंदर्भात लक्षवेधी मांडली.
Bhimrao Tapkir
Bhimrao TapkirSarkarnama

पुणे : हवेली तालुक्याचा विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन लोणी काळभोरपासून लोणीकंद या संपूर्ण परिसरातील सुमारे चाळीस गावांतील नागरीकांच्या सोयीसाठी लोणी काळभोर येथे अपर तहसिलदार कार्यालय (Tahsil Office) सुरू करण्याची घोषणा सोमवारी विधानसभेत करण्यात आली.या घोषणेने गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या पूर्व हवेली (East Haveli) तालुक्याच्या निर्मितीची सुरवात झाल्याचे मानण्यात येत आहे.

Bhimrao Tapkir
सत्ताधारी भाजपासमोर राष्ट्रवादीचे शेवटच्या दिवशीदेखील लोटांगण !

विधानसभेत आमदार अशोक पवार व भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरिकीकरण, विकास पाहता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्यासंदर्भात लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीस उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केली. थोरात म्हणाले, ‘‘ वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी-चिंचवड येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यानुसार मूळ हवेली कार्यालय व अपर तहसिल कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यस्थितीत कामकाज सुरू आहे. लोणी-काळभोर येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे.’’

Bhimrao Tapkir
पवारसाहेब; पुण्याचा विकास करू शकतो हा भ्रम तुम्ही पन्नास वर्षे जोपासलात

हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे. गेल्या काही वर्षात विस्तारलेल्या पुणे शहर व पिंपरी शहराचा काही भाग या तालुक्यात येतो.वाढते शहरीकरण व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे सध्याच्या हवेली तालुक्याच्या यंत्रणेवर ताण येतो. शिवाय तालुक्यातील नागरीकांनादेखील अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्वतंत्र पूर्व हवेली तालुक्याची मागणी गेल्या अनेक वषार्पसून होत आहे. मात्र, त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. तूर्त स्वतंत्र तालुका होत नसला तरी किमान लोणी काळभोर येथे होणाऱ्या अपर तहसिलदार कार्यालयामुळे या संपूर्ण परिसरातील नागरीकांची सोय होणार आहे. स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.

१६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत. तीन हजार १६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही महसूल मंत्री थोरात यांनी विधानसभेत सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com