...तर ऊस उत्पादक शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येईल !

सोलापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे भूमीपूजन व तयार झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

पुणे : सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी होता.आता सर्वाधिक ऊस उत्पादक जिल्हा झाला आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्या कारखान्यांनीच तब्बल २२ लाख टनांचे गाळप केले आहे. मात्र, केवळ साखरेचे उत्पादन करून यापुढे चालणार नाही. ऊसापासून उपपदार्थांच्या निर्मितीत आपण कमी पडलो आणि असाच ऊस लावत राहिलो तर एक दिवस ऊस उत्पादक शेतकऱ्यालादेखील आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा केंद्रीय रस्ते बांधणी आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिला.

Nitin Gadkari
राणा दांपत्याला उच्च न्यायालयाचा धक्का; याचिका फेटाळली

सोलापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे भूमीपूजन व तयार झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.गडकरी म्हणाले, ‘‘नव्या स्वरूपातील दुचाकींचे इंजिन फ्लेक्स इंजिन बनत आहेत. दुचाकी बनविणाऱ्या कंपन्यांनी तशी तयारी केली आहे. त्यामुळे शंभर टक्के इथेनॉलवर या दुचाकी चालू शकतील. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनाच्या मागे न लागता इथेनॉलचे उत्पादन घेतले पाहिजे. जिल्ह्यात बनविलेल्या इथेनॉलचा खप जिल्ह्यातच होणार आहे. त्यामुळे इथेनॉलचे उत्पादन कारखानदार व शेतकरी दोघांच्या हिताचे आहे.येणारा काळ इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायोएलएनजी,बायो सीएनजी, इलेक्ट्रिक आणि ग्रीन हायड्रोजनचा आहे. त्यानुसार कारखानदार आणि शेतकऱ्यांनी मानसिकता बदलली पाहिजे.’’

Nitin Gadkari
भोंगा वाद : सर्वपक्षीय बैठकीवर रिपब्लिकन पक्षाचा बहिष्कार...

गडकरी म्हणाले, ‘‘ टोयोटाची नवी गाडी ४० टक्के वीज आणि ६० टक्के बायोइथेनॉलवर चालनार आहे. माझ्याकडे ग्रीन हायड्रोजची गाडी आहे आणि ती मर्सिडीजपेक्षा ही चांगली आहे. त्यातून धूर ही निघत नाही आणि आवाज ही येत नाही फक्त पाण्याचे थेंब निघतात त्यामुळे ग्रीनहायड्रोजन हे आपलं भविष्य आहे.साखर कारखादारी टिकण्यासाठी कारखानदारांनी ग्रीनहायड्रोजनमध्ये शिरलं पाहिजे. साखरेबरोबरच सर्व प्रकारचे को-जनरेशन केलं नाही तर साखर कारखानदारी टिकणार नाही.’’

महाराष्ट्र साखरेच्या उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला म्हणून माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेच्या चेहऱ्यावर हास्य आहे, असा उल्लेख करीत ब्राझीलमध्ये जर साखर वाढली तर २२ रुपये किलो भाव होईल आणि उसाचा भाव कांही कमी करता येणार नाही. तुम्हाला राजकारण करायचंय त्यामुळं भाव तेवढाच द्यावा लागेल, मग काय स्थिती होईल याचा विचार करा, असा इशारा गडकरी यांनी दिला. टोयोटो, सुझुकी, ह्युंदाई या सारख्या गाड्यांमध्ये ब्राझीलमध्ये फ्लेक्स इंजिन आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये आपल्याकडेही या गाड्या येतील, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com