लोकमान्य टिळकांच्या कार्याचा अवमान थांबवा; टिळकांच्या खापरपणतूंचे आवाहन

राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधल्याचा दावा टिळक परिवारातील कोणत्याही व्यक्तीने आजपर्यंत केलेली नाही.
Kunal Tilak
Kunal TilakSarkarnama

पुणे : राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांनी बांधल्याचा दावा टिळक परिवारातील कोणत्याही व्यक्तीने आजपर्यंत केलेली नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विधानाला विरोध करण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा अवमान केला जातोय हे योग्य नाही. ठाकरे यांच्या एका विधानामुळे ब्राम्हणद्वेष इतका पुढे यावा, हे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया लोकमान्य टिळकांचे खापरपणतू कुणाल टिळक (Kunal Tilak) यांनी व्यक्त केली आहे.

Kunal Tilak
अल्टिमेटमची भाषा करू नये, हे कायद्याने चालणारे राज्य...शंभूराज देसाई

औरंगाबादाच्या सभेत बोलताना दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला होता. टिळक यांना छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचा दावा केला होता. त्यावर गेल्या दोन दिवसात राज्यभरात विविध व्यक्ती तसेच संघटनांकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापासून संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनर राज ठाकरे यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत थेट लोकमान्य टिळक यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे टिळक कुटुंबियांकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

Kunal Tilak
राज ठाकरेंवर गुन्हा; बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे नॉट रीचेबल अन् वसंत मोरे तिरुपतीला रवाना

यावर बोलताना कुणाला टिळक म्हणाले, ‘‘ राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या भाषणात लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला आहे. मात्र, टिळक कुटुंबियांपैकी कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसंबंधी दावा केलेला नाही. त्यामुळे या निमित्ताने टिळकांविषयी चुकीची विधान केली जात आहेत. त्यातून लोकमान्य टिळकांच्या कार्याचा अवमान केला जात आहे. एका व्यक्तीने केलेल्या विधानांमुळे लोकमान्य टिळक यांच्यासारख्या अलौकीक काम केलेल्या व्यक्तीमत्वावर चुकीच्या पद्धतीने टीका केली जात आहे.’’

दरम्यान, ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणावरून राज्यभर राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राज्य सरकार मनसैनिकांवर कारवाई करण्याची तयारी करीत आहे. औरंगाबादमधील सभेत केलेल्या भाषणावरून ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी राज्यभरात हनुमान चालिसा पठण करण्यात येणार असल्याने प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून राज्यातील विविध शहरात पोलिसांनी मनसैनिकांना नोटीसा बजावण्यास सुरवात केली आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com