पवारांकडून ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण; मिटकरी, केतकी चितळे वादावर तोडगा?

Sharad Pawar | NCP | : चर्चेला जाण्यावरुन ब्राह्मण संघटनांमध्ये दोन मतप्रवाह.
Sharad Pawar | NCP
Sharad Pawar | NCP Sarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून राज्यातील अखिल भारतीय ब्राह्मण (Brahman) महासंघासोबतच विविध ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. उद्या (शनिवारी) पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय इथे सायंकाळी ५ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. (Sharad Pawar Latest News)

एकीकडे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून ब्राह्मण समाजाबाबत करण्यात आलेली वक्तव्ये आणि दुसरीकडे शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतं यामुळे दुषित झालेलं वातावरण निवळण्याचा आणि काहीशी साखरपेरणी करण्याचा प्रयत्न बैठकीच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (NCP, Sharad Pawar, Brahman Latetst News)

मात्र शरद पवार यांच्या या बैठकीला जायचे की नाही यावर ब्राह्मण संघटनांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. परशुराम सेवा संघ, ब्राह्मण महासंघ या संघटनांनी या बैठकीला जाणार नसल्याचे सांगत चर्चेवर बहिष्कार घातला आहे. ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी स्पष्ट केले आहे. तर अन्य संघटना या बैठकीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

काय म्हणाले आनंद दवे?

समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी, संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू. पण अगदी परवाच्या प्रकरणानंतर शरद पवार यांनी आमदार अमोल मिटकरी यांना त्यांचे वक्तव्य माघार घ्यायला सांगायला हवे होते. उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली. त्याच व्यासपीठावर त्यांच्याच उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली आणि आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिलं.

देवांचा बाप असल्याचा पण साक्षात्कार शरद पवार यांना अगदीच काल, परवा झाला. केतकी चितळे पूर्णतः चुकल्याचे मान्य आहे. आपण पण तिच्यावर टिकाच केली. पण शरद पवार यांनी जर केतकी यांना माफ करून गुन्हे मागे घेण्यास सांगितले असते तर ते खूप मोठे झाले असते. पण केतकी यांच्यावर २८ ठिकाणी गुन्हे दाखल केले, त्याच पोलिसांनी मिटकरी यांच्यावर मात्र एकही गुन्हा नोंदवला नाही. आपल्या आंदोलनानंतर राज्यभर समाज जागा झाला, पण तरीही त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली (दिवंगत माणसावर टीका करत नाहीत शक्यतो कोणीच)

आपला शरद पवार यांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही, त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाज सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याच फारसे ऐकीवात नाही. पण राजकीय फायद्यासाठी शरद पवार ब्राह्मण समाजाचा वापर करतातं हे निश्चित. त्यांनी मिटकरी, भुजबळ यांच्या वक्तव्यांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा आहे. अर्थात ज्या ज्या वेळेस शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जातीय उल्लेख केले आहेत त्या वेळेस अन्य राजकीय पक्ष सुद्धा मूग गिळून गप्प असतात हे सुद्धा तितकच दुर्दैवी सत्य. त्यामुळे शरद पवार यांना सार्वजनिक व्यासपीठावर भेटण्याची ही वेळ नाही. त्यातून दुरावा आणखी वाढेल असे आम्हाला वाटते, असे दवे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com