‘सरकारनामा’ औंध-बोपोडीत : आमदार-खासदार काळे की गोरे दोन वर्षांत पाहिलेच नाहीत!

भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार व नगरसेवकांचे आपसात मतभेद आहेत.त्याचा परिणाम विकास कामावर झाल्याचा आरोप माजी नगरसेवक शिवाजी बांगर (Shivaji Bangar) यांनी केला.
sarkarnama : Aundh-Bopodi
sarkarnama : Aundh-BopodiSarkarnama

पुणे : भारतीय जनता पार्टी (Bjp) विकासाच्या केवळ गप्पा मारत आहे. गेल्या दोन वर्षात औंध-बोपोडी प्रभागात स्थानिक आमदार व पुण्याचे खासदार फिरकले नाहीत.ते काळे की गोरे माहीत नाही, अशी या प्रभागाची स्थिती आहे, अशी टीका कॉंग्रेसचे (congress) माजी नगरसेवक कैलास गायकवाड (Kailas Gaikwad) यांनी केली.मात्र, कुणी काहीही टीका केली तरी महापालिका व ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून या भागाचा विकास केल्याचा दावा नगरसेविका अर्चना मुसळे यांनी केला.

sarkarnama : Aundh-Bopodi
पुणे पालिका : १४ मार्चपूर्वी निवडणुका जाहीर न झाल्यास प्रशासक येणार ?

‘सरकारनामा आपल्या वॉर्डात’ या ‘सरकारनामा’ आयोजित विशेष कार्यक्रमात औंध-बोपोडी प्रभागातील नगरसेवक, सर्व पक्षीय इच्छुक तसेच नागरीकांशी झालेल्या सवांदात या भागातील विकास व स्थानिक राजकारणावर चर्चा झाली.यावेळी बोलताना कैलास गायकवाड यांनी स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे तसेच खासदार गिरीश बापट हे औंध-बोपोडीच्या मतदारांच्या अजिबात संपर्क नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.

विकासाची कामे काही भागापुरतीच होत आहेत.बोपोडी परिसरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरीकांचे अनेक प्रश्‍न गेल्या पाच वर्षात मार्गी लागलेले नाहीत,असा आरोप ‘आरपीआय’चे कार्यकर्ते रमेश ठोसर यांनी केला.भारतीय जनता पार्टीसोबत महापालिकेच्या सत्तेत ‘आरपीआय’ असतानादेखील ठोसर यांनी स्थानिक विषयावरून सत्ताधारी नगरसेवकांना चांगलेच धारेवार धरले. विशेष म्हणजे याच प्रभागातून निवडून आलेल्या ‘आरपीआय’च्या सुनिता वाडेकर या पुण्याच्या विद्यमान उपमहापौर आहेत.

sarkarnama : Aundh-Bopodi
‘पीएमपीएमएल’चा कारभार : पुणेकरांच्या खिशावर दरोडा घालत ठेकेदारांना ९१ कोटी

भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार व नगरसेवकांचे आपसात मतभेद आहेत.त्याचा परिणाम विकास कामावर झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी नगरसेवक शिवाजी बांगर यांनी केला.काही स्थानिक नगरसेवकांशी भाजपाच्या आमदारांशी वाद आहेत हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना भाजपाचे मधुकर मुसळे यांनी असा कोणताही वाद असल्याचा इन्कार केला. विरोधक आमच्यात वाद असल्याचा चुकीचा प्रचार करीत आहेत. या कसेलही तथ्य नाही, असे मुसळे यांनी स्पष्ट केले.

भाजपाच्या चारही स्थानिक नगरसेवकांनी चांगले काम केले आहे.त्यांनी पाच वर्षे केलेल्या कामावर ते पुन्हा निवडून येतील, असा विश्‍वास स्थानिक नागरीक अजय मुंडे यांनी व्यक्त केला.निवडून येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव वापरण्याची गरज पडणार नाही, असा विश्‍वास मुंडे यांनी व्यक्त केला.

औंध-बोपोडी या प्रभागात सोसायट्यात राहणाऱ्या लोकांपेक्षा झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची संख्या तुलेनेने जास्त असून या वस्त्यांच्या विकासाकडे फारशा गांभार्याने पाहिले जात नसल्याचा आरोप ठोसर यांनी केली.विशिष्ट भागाचा विकास हेच धोरण असून ज्या भागाच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज त्या भागाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही, असा आरोप ठोसर यांनी केला.

विरोध करणे हे विरोधकांचे काम आहे. आम्ही पाच वर्षात चांगले काम केले आहे.स्मार्ट सिटीचे प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने राबविले आहे.विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत.त्यामुळे कुणी काहीही म्हटले तरी आम्ही केलेले काम मतदारांना चांगले माहीत, असे नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले.कामाच्या जोरावर आम्ही पुन्हा पालिकेच्या सत्तेत येणार आहोत, असा विश्‍वास मुसळे यांनी केला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com