
पुणे : बारामती जिंकण्यासाठी भाजपने (bjp) कंबर कसली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच बारामतीचा दौरा केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर (ncp) टीका केली. "काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश मधील अमेठी मतदार संघातून भाजपने हरवले आणि आता बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंना आम्ही हरवणार आहे," असे बावनकुळे म्हणाले होते. (rohit pawar latest news)
बावनकुळे यांच्या विधानाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (rohit pawar)यांनी समाचार घेतला आहे. आमचा बारामतीकरांवर विश्वास आहे, असा टोमणा रोहित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत रोहित पवार यांनी मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मित्र मंडळात ढोल वादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, "मी गणपती बाप्पांकडे सत्तेची प्रार्थना केली नाही. मात्र, राजकारणाची पातळी खाली जात आहे. लोकांच्या विकासावर राजकारण व्हावे. सुडाचे राजकारण थांबवावे. भावनिक विषयांवर राजकारण न होता विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण व्हावे,"
"भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवे," असे पवार म्हणाले.
"आज बारामती पवार मुक्त करायची, मुंबई ठाकरे मुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचे राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शेतकर्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत. बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे," असे रोहित पवार यांनी नमूद केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.