Fadnavis vs Raut : राऊतांचे आरोप चुकीचे, सनसनाटी निर्माण करण्यासाठी; फडणवीस स्पष्टच बोलले

Maharashtra : ''सुरक्षेचा विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हातात नसतो...''
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Sanjay Raut News : ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी त्यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. पुणे येथे आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी स्पष्ट उत्तर दिले.

ते म्हणाले, पत्रानुसार काही तथ्य आढळले तर राऊतांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थापन केलेल्या समितीमार्फत सुरक्षा दिली जाईल. अन्यथा कारवाईही केली जाईल.

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) पत्रावर फडणवीस यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. ते म्हणाले, "पत्र सुरक्षा मागण्यासाठी की सनसनाटी निर्माण करण्यासाठी?" त्यानंतर त्यांनी सांगितले की, "सुरक्षेचे विषय राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. पुरव्याशिवाय आरोप करणे त्याहीपेक्षा चूक आहे. कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर त्याची कारवाई इंटिलिजेन्ट विभागाकडून केली जाते."

Devendra Fadnavis
Supreme Court hearing : कपिल सिब्बलांचे मुद्दे महत्त्वाचे; न्यायालयासमोरच पेच : काय म्हणाले न्यायमूर्ती?

सुरक्षेबाबत राज्यात राजकारण केले जात नसल्याचेही पडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, " सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थापन केलेल्या समितीमार्फत सुरक्षा दिली जाते. कुणालीही सुरक्षा देण्याचे काम मुख्यमंत्री किंवी उपमुख्यमंत्री करीत नाही. राऊतांनी दिलेले पत्र संबंधित समितीकडे देण्यात येईल. त्यानुसार समिती चौकशी करेल. त्यात काही तथ्य आढळले तर आवश्यक ती सुरक्षा पुरविली जाईल. याबाबत महाराष्ट्रात राजकारण (Maharashtra Politics) केले जात नाही."

Devendra Fadnavis
Tupkar : अशोक चव्हाण यांच्यानंतर आता रविकांत तुपकर यांच्या जिवाला धोका, म्हणाले...

यानंतर फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राऊतांवर काही आरोपही केले. ते म्हणाले, "अलिकडे त्यांना प्रसिद्धीसाठी विनाकारण आरोप करण्याची सवय लागली आहे. पूर्वी त्यांच्या आरोपांना उत्तर देत होतो. आता त्यांचे आरोप चुकीचे असतात. त्यामुळे त्यांच्या आरोपांना काय उत्तरे द्यायचे हाही प्रश्न पडतो."

Devendra Fadnavis
Officer Dispute : फेसबूक पोस्टवरून IAS-IPS महिला अधिकारी भिडल्या; सरकारने थेट उचललं 'हे' पाऊल

खोटे आरोप करून सहानुभूती मिळत नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच राऊतांवर कारवाईचे संकेतही दिले. ते म्हणाले, "या सनसनाटीतून त्यांना काही फायदा होणार नाही. यातून त्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती मिळणार नाही. रोज खोटे बोलण्याने कधीच सहानुभूती मिळत नाही. चुकीचे आरोप केल्यामुळे उद्या कोणी मागणी केली तर त्यांच्यावरच कारवाई होऊ शकते."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com