Ajit Pawar : डाळ शिजली पण रवा नाही ; 'आनंदाचा शिधा'वरुन अजितदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Ajit Pawar : शिधेच्या पॅकेटवर आमदारांनी स्वतचे फोटो लाऊन हौस भागवली,
Eknath Shinde | Ajit Pawar
Eknath Shinde | Ajit Pawar Sarkarnama

Ajit Pawar: शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीच्या तोंडावर 'आनंदाचा शिधा' या योजनेचा मोठा गाजावाजा केला होता. या योजनेतंर्गत रेशन कार्डधारकांना फक्त १०० रुपयांमध्ये रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र,दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत फराळासाठी आवश्यक असणारा हा आनंदाचा शिधा अनेक रेशनिंग दुकानांमध्ये पोहोचला नाही.

राज्यातील सत्ताधारीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत.याबाबत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. ते पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

"अनेक व्यक्तींना मधील केवळ दोन गोष्टी मिळाल्या,डाळ पोहचली तर रवा नाही, तर काही लोकांना साखर मिळलीच नाही. अशी या शिधा योजनेची गत झाली आहे. शिधेच्या पॅकेटवर आमदारांनी स्वतचे फोटो लाऊन हौस भागवली," असा अजित पवार यांनी सरकारला हाणला.

अजित पवार म्हणाले, "आम्ही सत्तेत असतांना सरकारी योजनांवर केवळ प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांचेच फोटो वापरले. इतरांचे फोटो वापरुन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाला की नाही यची देखील चौकशी व्हायला पाहिजे,"

Eknath Shinde | Ajit Pawar
Bachchu Kadu : 'फुसका फटका' की बॅाम्ब ? ; ट्रेलर 1 तारखेला, 15 दिवस पिक्चर बघा !

"राज्यातील अनेक रेशन दुकानात आनंदाचा शिधा पोहचलाच नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मंत्री आणि आमदारांना मार्गदर्शन करावे. शिधा कसा वितरीत करावा हेही त्यांना शिकवावे, आक्षेपार्ह वक्तव्य सत्ताधाऱ्यांनी केले तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहावे ?"असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा, हा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असफल ठरला असून, त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.

गुजरातला गेलेल्या या प्रकल्पामुळे राजकारण पेटलं आहे.यावर अजित पवार म्हणाले, "राज्य सरकारने अशाप्रकारे सांगितले होते की, मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे प्रकल्प राज्यात येतील. मात्र, नविन प्रकल्प न येता जे प्रकल्प येणारे होते ते देखील बाहेर जात आहेत. वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन गुंतवणुकीसाठी प्रयत्न करीत आहेत. राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प राज्य बाहेर जात असताना हे कुणाच्या नाकर्तेपणामुळे होत आहे याचे परीक्षण केले पाहिजे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com