पालिका कर्मचाऱ्यास धक्काबुक्की..नगरसेवकाची कारागृहात रवानगी  

कॉग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सादिक हसन फरास आणि त्यांचा सहकारी शाहिद कदीर शेख यांची शुक्रवारी (ता.७) कारागृहात रवानगी करण्यात आली.
सादिक फरास1.jpg
सादिक फरास1.jpg

भोर (पुणे) : नगरपालिकेच्या कर्मचा-यास धक्काबुक्की व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगरपालिकेतील कॉग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सादिक हसन फरास आणि त्यांचा सहकारी शाहिद कदीर शेख यांची शुक्रवारी (ता.७)  कारागृहात रवानगी करण्यात आली. 

येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने शुक्रवारी (ता.७) सायंकाळी याबाबतचे आदेश दिले, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजू मोरे व तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली. १६ जुलै रोजी सादिक फरास व कदीर शेख यांनी नगरपालिकेतील रचना साहाय्यक पवन भागणे यांना कामकाजाच्या वेळेत शिवीगाळ करून दमदाटी व धक्काबुक्की केली, आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. पवन भागणे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्यांच्यावर १७ जुलैला गुन्हा दाखल केला होता. 

त्यानंतर सादिक फरास व शाहिद शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यांनंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, तर तोही न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे सादिक फरास व शाहिद शेख हे दोघे शुक्रवारी (ता.७) सकाळी  पु्ण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात शरण गेले. न्यायालयाने त्यांना भोरच्या न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी 
भोर न्यायालयाने त्यास हजर करून पोलिसांकडून अहवाल मागविला आणि दोघांची रवानगी येरवडा कारागृहात केली. पोलिस निरीक्षक राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार तपास करीत आहेत.

 
हेही वाचा : उद्धघाटनाचा फार्स..गावाला दिलेल्या बोटी परत मागविल्या...  

पुणे : "महापूराचा संभाव्य धोका ओळखून सांगली जिल्हा परिषदेने ब्रम्हनाळ या गावाला दिलेल्या बोटी एका मंत्रिमहोदयांना उदघाटन करण्यासाठी परत मागवल्या आहेत. पण बोटीला हात लावाल तर याद राखा. महापूरांचे संकट समोर असताना हा काय पोरखेळ लावला आहे ?" असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी विचारला आहे. "तुम्ही कोणाच्या तालावर नाचताय?"असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. गेल्या वर्षी ज्या गावात महापुरांचे संकट आले होते. त्या गावांना जिल्हा परिषदेच्या वतीने 15 बोटी दिल्या आहेत. त्यातील दोन बोटी ब्रम्हनाळ आणि भिलवडी गावाला दिल्या. गावात बोटी पोहोचल्यावर प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाना फोन करून बोटी परत मागवल्या. केवळ उद्घाटनाचा फार्स करण्यासाठीच या बोटी परत मागवल्या. हा प्रकार संताप आणणारा आहे," असे देशमुख म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com