
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून आरोप-प्रत्यारोप अद्यापही थांबताना दिसत नाहीत.
मागील काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या चर्चेनंतरच झाला होता, असा गौप्यस्फोट केला होता. तसेच अजित पवारांनी याबाबत बोलावं त्यानंतर मी पुन्हा याबाबत बोलेल, असंही ते म्हणाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती.
यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी असत्याचा आधार घेतला असं म्हटलं होतं. यानंतर आता पुन्हा पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांनी मोठे विधान केले आहे.
''या विषयावर अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? तसं झालं नसतं तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?'', असे विधान शरद पवारांनी केले. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीचा विषय चर्चेत आला आहे.
दरम्यान, पवारांनी केलेल्या या विधानानंतर आता पुन्हा फडणवीसांनी गुगली टाकली आहे. फडणवीस म्हणाले की, ''बरं झालं आता त्यांनी स्वत:च याबाबत खुलासा केला. आता ते एवढं बोललेच आहेत तर राष्ट्रपती राजवट का लागली? त्यामागेही कोण होते? कोणाच्या सांगण्यावरून लागली? या सर्व गोष्टींचा खुलासा देखील ते करतील अशी अपेक्षा आहे, त्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील'', असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून आरोप-प्रत्यारोप अद्यापही राजकारण थांबताना दिसत नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.