आम्हाला कामधंदे आहेत, म्हणत फडणवीसांनी उडवली राऊतांची खिल्ली

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आरोपांना फडणवीसांचे प्रत्युत्तर
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : राजकीय फायद्यांसाठी, निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही जे करत आहात ते देशासाठी घातक आहे. कालही दिल्लीत हमुनान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर जो हल्ला झाला, तसा यापूर्वी कधीही झाला नव्हता. मात्र, आज देशात निवडणुका (Election) जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, काल दिल्लीत (Delhi) मिरवणुकीवर झालेला हल्ला हो पूर्वनियोजित होता, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राऊत यांच्यावर टीका केली.

देवेंद्र फडणवीस पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांना संजय राऊतांच्या आरोपांवर विचारले असता ते म्हणाले, संजय राऊत हे निराश व्यक्ती आहेत. ते दिवसभरात काहीही बोलत असतात. कितीवेळा आम्ही उत्तरे द्यायची. आम्हाला कामधंदे आहेत, त्यांना नाहीत, अशा शब्दांत त्यांनी राऊतांची खिल्ली उडवली.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर फडणवीस म्हणाले...

राऊत काय म्हणाले होते?

राजधानी दिल्लीत शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीवर काही समाज कंटकांनी हल्ला केला. या घटनेवर बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टिका केली. ''कालचा हल्ला हा राजकीयदृष्ट्या प्रेरित होता. देशात पुन्हा हिंदू मुसलमान दंगे व्हावेत, असे वातावरण तयार केले जात आहे. कारण आता निवडणुकांमध्ये भारत पाकिस्तान चालणार नाही, सर्जिकल स्ट्राईक, राममंदिर चालणार नाही. म्हणून देशातील चार-पाच राज्यातील आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतांच्या दृष्टीने देशातील वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र सुरु, असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
जेम्स लेननी त्या पुस्तकातील एक पान फाडून टाकावे; आमचे काही म्हणणे नाही : आव्हाड

याच वेळी त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवरही भाष्य केले. "महाराष्ट्रातही मुंबईपासून राज्यातील अनेक भागात रामनवमी, हनुमान जयंतीच्या दिवशी शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला, दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला गेला, पण महाराष्ट्रातील जनता आणि पोलीस संयमी आहेत. भगवान श्रीराम आणि हनुमान यांच्या नावाखाली महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचा, दंगे भडकावण्याचा येथील नव हिंदू, नव्या ओवेसींचे मिशन होते. पण आम्ही तसे होऊ दिले नाही, आणि यापुढेही होऊ देणार नाही, असेही राऊत म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com