Sharad Pawar : ''पहाटेच्या शपथविधीमुळे एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे...'' ; शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याविषयी केलेल्या गौप्यस्फोटामुळे पहाटेचा शपथविधी राज्याच्या राजकारणात पुन्हा केंद्रस्थानी आला आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar News : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी २०१९ मध्ये एका पहाटे अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती व सरकार स्थापन केलं होतं. हे सरकार दीड दिवसांत कोसळलं. त्यामुळं भाजपची चांगलीच नाचक्की झाली होती.

मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शपथविधी शरद पवार यांच्या संमतीनेच झाला होता असा दावा केला होता. त्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यावर मोठं विधान केलं आहे.

शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीमुळे एक गोष्ट चांगली झाली. राज्यात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट या शपथविधीमुळे उठली असं शरद पवार( Sharad Pawar) यावेळी म्हणाले. तसेच पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. तसेच समझनेवालों को इशारा काफी है असंही ते यावेळी म्हणाले.

Sharad Pawar
Supreme Court hearing : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वाचले मराठीतील पत्र; काय घडले न्यायालयात...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याविषयी केलेल्या गौप्यस्फोटामुळे तीन वर्षांपूर्वी झालेला पहाटेचा शपथविधी राज्याच्या राजकारणात पुन्हा केंद्रस्थानी आला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेतेमंडळी व भाजप नेत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, त्यावर अजित पवारांनी कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

Sharad Pawar
Dhananjay Munde News: धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; करुणा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मोठी मागणी

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हांला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे. अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, ठरल्यानंतर कसं तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील. असंही फडणवीस म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com