म्हणून... या खोके सरकारवर कोणाचाही विश्वास राहिला नाही

Adithya Thackeray | 'फॉक्सकॉन-वेदांता'नंतर आता C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्पही महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला नेण्यात आला
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

Aditya Thackeray पुणे : आज चौथा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला. पण मंत्री उदय सामंत यांना वेदांता फॉक्सकॉन प्रमाणे एअरबसचा प्रकल्पही माहिती नव्हता का, कशाच्या आधारे त्यांनी ही वक्तव्ये केली होती, असा सवाल उपस्थित करत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर हल्लाबेल केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'फॉक्सकॉन-वेदांता'नंतर आता C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्पही महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. यावरुन आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. गुजरातमध्ये वडोदरा येथे हा प्रकल्प होणार असून येत्या 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे.

Aditya Thackeray
भाजपच्या बड्या नेत्याकडून निवृत्तीची घोषणा; आता मला...

'' चार प्रकल्प आपल्या हातातून गेले, शेतकऱ्यांना कृषीमंत्री कोण आहेत माहिती नाही. केंद्रात आणि राज्यात त्यांचच सरकार असताना प्रकल्प राज्याबाहेर जातात कसे, असा सवाल उपस्थित करत उद्योजकांना उद्याेजक कोण आहे हे माहिती नाहीत. या खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास राहिला नाही म्हणून प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. जो माणूस निवडणुकीला सामोरे जायला तयार नाही, तो गुंतवणूक काय आणणार .. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

जर कोणत्याही प्रकल्पाचा करार एखाद्या राज्याबरोबर झाला, किंवा कंपनीबरोबर झाला असेल तर तो दुसऱ्या राज्यात जाऊ शकत नाही. हे प्रत्येक कॅबिनेट मंत्र्याला माहिती असतं. मग जर त्यांना हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणार आहे, हे माहिती होते तर ते इतके दिवस शांत का बसले. मी सुभाष देसाईंसोबत काम करत असताना एक समिती निर्माण केली होती. राज्यातील उद्योग बाहेर जाऊ नयेत यासाठी काही उद्योजकांची ही समिती स्थापन करण्यात आली होती. पण गेल्या तीन महिन्यात या समितीची एकही बैठक न झाल्यामुळे प्रकल्प राज्यातून बाहेर जात आहेत, असे आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aditya Thackeray
`समृद्धी`च्या दर्जाहीन कामात कोणाकोणाचे खिशे गरम झाले

आपल्या राज्यातून मोठमोठे प्रकल्प बाहेर जात असताना राज्याचे मुख्यमंत्री मात्र मंडळांना भेटी देणे,दहीहंडी, राजकीय भेटी, फोडाफोडी करणे यातच बिझी आहेत. जसे मुख्यमंत्री शिवराज सिंह आपल्या राज्यात आले, नवीन पटनाईक आपल्या राज्यात आले, इकडच्या उद्योजकांशी चर्चा केली. तशी गेल्या तीन महिन्यातील अशी एक गोष्ट दाखवा मला की, आपल्या मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात जाऊन चर्चा केलीये.

महाविकास आघाडी सरकारने कोरोना महामारी असतानाही साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. यातले ९९ टक्के प्रकल्पांवर आज काम सुरु झाले आहे. राज्यात अस्थिरता असताना जो माणूस निवडणूकांना सामोरे जाऊ शकत नाही तो गुंतवणूक काय आणणार, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com