राणेंचा मार्च कुठला ते शोधावे लागेल

माध्यमांशी संवाद साधतांना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राणेंच्या (Narayan Rane) वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
Narayan Rane-Bhujbal
Narayan Rane-BhujbalSarkarnama

पुणे: राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यानंतर अनेक भाजप (BJP) नेत्यांकडून सरकार पडण्याबाबत भविष्यवाणी करण्यात येत आहे. आता केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सुद्धा राज्य सरकार पडणार असून मार्चमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे भाकीत केले आहे. मात्र, राणेंच्या या वक्तव्याची मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राणेंचा मार्च कुठला ते शोधावे लागेल, असे म्हणत चांगलीच खिल्ली उडवली आहे.

Narayan Rane-Bhujbal
अजितदादा त्यावेळी मला म्हणाले होते, ‘हरभजनदेखील मॅच जिंकून देतो!’

भुजबळांना आज (ता. 27 नोव्हेंबर) पुण्यात माध्यम प्रतिनिधींनी राणेंच्या भविष्यवाणीबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारने दोन वर्षात चांगल काम केले आहे. या कामावर मी या समाधानी आहे. मात्र, आता राणेंनी 'मार्च'ची डेडलाईन दिली आहे. पण त्यांचा मार्च कुठला ते शोधावे लागेल. राणेंनी दिलेला पुढचा व त्याच्या पुढचा असे करत असेच पाच वर्ष होतील. पण महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. मात्र, मजबूत होत जाईल, असा टोला त्यांनी लगावला.

पुणे येथील राष्ट्रीय स्मारक असलेल्या फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण व भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला भुजबळांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रा. हरी नरके आदी उपस्थित होते.

Narayan Rane-Bhujbal
पंडितअण्णा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात या गोष्टीवरून वाद झाला होता...

यावेळी बोलतांना ते म्हणाले , 1948 साली भिडेवाड्यात महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात यावी. केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. त्यामुळे येथे सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, राणे यांनी भाजपच्या सत्ता स्थापनेच्या भाकीताची खिल्ली ही राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही उडवली आहे. ते म्हणाले की, बोकड, कोंबड्या ठेवून आणि नवसाने सरकार पडत नाही किंवा बनत नाही. सुरुवातीला भविष्यवाणीने सरकार पाडत होते. आता नवसाने पाडण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, या भ्रमात राहू नये. काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता 'त्या' कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावेच लागत आहे.

देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. अशी भविष्यवाणी करुन थकले. शेवटी त्यांची भविष्यवाणी खरी होईना म्हटल्यावर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करू लागले. मात्र, आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे, असा समाचार मलिकांनी भाजप व राणेंचा घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com