राऊतांचे मौन : मनसेचं टि्वट, आघाडी सरकार म्हणजे 'अमिताभ-जया-रेखा' यांचा 'सिलसिला'

आघाडीतील कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षाची अवस्था 'सिलसिला'मधील प्रेमाच्या त्रिकोणासारखी आहे.
Sanjay Raut,Sandeep Deshpande
Sanjay Raut,Sandeep Deshpandesarkarnama

पुणे : देशाच्या पातळीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अत्यंत गढूळ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी शिवसेनेची (Shiv Sena), खासदार नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी काल (29 मार्च) एक असं टि्वट केलं आहे. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊतांनी 'मौन' पाळण्याचा सल्ला आपल्या टि्वटच्या माध्यमातून दिला आहे. संजय राऊत यांनी आपला एक फोटो पोस्ट करत त्यासोबत 'कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं...' एवढाच मजकूर पोस्ट केला आहे. संजय राऊत यांच्या याच पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

'सिलसिला' या चित्रपटातील एक सीन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी टि्वट करीत संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे. 'सिलसिला' मध्ये 'अमिताभ-जया-रेखा' हा प्रेमाचा त्रिकोण खूपच गाजला. ''सध्या महाविकास आघाडीतील कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षाची अवस्था 'सिलसिला'मधील या प्रेमाच्या त्रिकोणासारखी आहे,'' असे संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन सूचित केले आहे.

अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, यांची भूमिका असलेला या चित्रपटातील गाजलेल्या त्या ओळी चित्रफीतीसह संदीप देशपांडे यांनी टि्वट केले आहे. राऊतांच्या मैानाचे भाषांतर देशपांडेंनी केले आहे. ''सांगण्यासाठी खूप काही आहे. पण कुणाला सांगणार, कधीपर्यंत शांत बसणार,'' अशा अमिताभ बच्चन यांच्या ओळी चित्रपटात बरेच काही सांगून जातात.

Sanjay Raut,Sandeep Deshpande
पवारांचा मित्र असल्याचे सांगत गुन्ह्यांचा चुकीच्या पद्धतीने तपास करण्यासाठी पोलिसांवर दबाव

संजय राऊत हे कायमच आपल्या विरोधकांना अंगावर घेत आले आहेत. यावेळी विरोधकाला नामोहरम करण्यासाठी ते सगळ्या नितींचा वापर करताना दिसतात. त्यातही त्यांचे शाब्दिक फटकारे हे अत्यंत बोचरे असतात. मागील काही दिवसात तर त्यांची भाषा शिवराळ झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. या मागचं कारण म्हणजे केंद्रीय यंत्रणांचा महाविकास आघाडीच्या मागे लागलेला ससेमिरा. पण असं असताना आता अचानक राऊतांनी 'मौनाची' भाषा केली आहे.

राजकारणातील प्रत्येक कृतीला वेगवेगळे अर्थ असतात. राजकीय क्षेत्रात वावरणारी व्यक्ती ही प्रत्येक कृती अत्यंत चालाखीने करत असल्याचं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे. अशावेळी संजय राऊतांसारख्या व्यक्तीमत्वाने मौन पाळणं हे चांगलं उत्तर असतं असं म्हटल्याने आता या मौनाचा सूचक अर्थ काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com