Raj Thackeray News : राणे-राऊत काय बोलले हेच सुरु असतं, पवार मध्येच बोलतात, यामुळे मी काहीही बोलत नाही..

Raj Thackeray News : जे काही सुरू आहे त्याला राजकारण म्हणता येणार नाही
 Sharad Pawar, Raj Thackeray
Sharad Pawar, Raj Thackeray Sarkarnama

Sharad Pawar news : पुण्यात सुरू असलेल्या 18व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी माध्यमांना टोला लगावला.

सध्याचे राजकारण, माध्यमांची भूमिका यावर राज ठाकरेंनी ताशेरे ओढले. प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.

सध्याच्या राजकारणाबाबत राज ठाकरे म्हणाले, "राजकारण दिशाहीन झाल्याचे चित्र आहे. राजकारणाची पातळी घसरली आहे.माध्यमांमध्येदेखील क्रिया आणि प्रतिक्रिया या पलीकडे काहीच दिसत नाही. राज्यात इतके प्रश्न असूनही नारायण राणे काय बोलले, संजय राऊत काय बोलले, हेच सुरू आहे. शरद पवार मध्येच येतात आणि बोलतात. त्यामुळेच मी आता काहीही बोलत नाही,"

 Sharad Pawar, Raj Thackeray
Gautam Adani News : नरेंद्र मोदींशी किती जवळीक ? खुद्द अदानींनीच सांगितले .. “सरकार कुणाचेही असो.."

"जे काही सुरू आहे त्याला राजकारण म्हणता येणार नाही. महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्ये केली जात आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. कोणी कशावरही बोलायला लागले आहेत. कोणीही इतिहास तज्ज्ञ होताहेत. कारण हे सर्व टीव्हीवर दाखवले जात आहे," असे राज ठाकरे म्हणाले.

 Sharad Pawar, Raj Thackeray
Raj Thackeray News : सध्याच्या राजकारणाबाबत राज ठाकरेंना काय वाटतयं ?

राज ठाकरे म्हणाले, "सध्या राज्यात सुडाच्या राजकारणापेक्षा बडबड करण्याचे राजकारण सुरु आहे. राजकारणात येऊ पाहणारी पिढी याकडे गंभीरपणे पाहत आहे. रोज सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर पकपक सुरु होते. यातून नवीन पिढ्या नष्ट होत आहेत. त्यामुळे राजकारणात यायचे की नाही, याबाबत नवी पिढी संभ्रमात आहेत,"

हिंदी वृत्तवाहिन्याप्रमाणे ओरडून बोलण्याची प्रथा मराठी वृत्तवाहिनीमध्ये सुरु असल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राज्यात येणारे अनेक उद्योग राज्याच्या बाहेर गेले, याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण गुजरातचे आहोत, म्हणून केवळ गुजरातला प्राधान्य देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही. महाराष्ट्रातून एखाद दुसरे उद्योग इतर राज्यात गेल्याने काही फरक पडत नाही. महाराष्ट्राने जे उद्योग आहेत ते टिकवून ठेवले तरी महाराष्ट्र नेहमीच पुढे राहील,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com