चंद्रकांत खैरे राहतात औरंगाबादला आणि गोळ्या मारतात ढगात : शहाजी पाटलांची टीका

फक्त शेवटच्या गटांगळ्या मारतो माणूस, तसं त्यांच्याकडून गटांगळ्या मारण्याचे काम चालू आहे.
Shahaji Patil-Chandrakant Khaire
Shahaji Patil-Chandrakant KhaireSarkarnama

पुणे : चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) राहतात, औरंगाबादला (Aurangabad) आणि ढगात गोळ्या मारून वातावरण भांबावून सोडण्यापुढे त्यांच्याकडे उद्योग नाही, असे उत्तर शिवसेनेचे (shivsena) बंडखोर आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी शिवसेनेचे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिले आहे. (MLA Shahaji Patil criticizes former MP Chandrakant Khaire)

बंडखोर आमदारांपैकी १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शहाजी पाटलांनी आपल्या ढंगात उत्तर दिले. ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे राहतात, औरंगाबादला. त्यांचा अजून आकडाही निश्चित नाही. यातील १० धरायची की १५ धरायचा. खैरे यांना नेमकं काय म्हणायचे आहे. ढगात गोळ्या मारून वातावरण भांबावून सोडण्याचा त्यांचा उद्योग आहे. त्यांना काही येत नाही. त्यांना कळून चुकलेलं आहे. फक्त शेवटच्या गटांगळ्या मारतो माणूस, तसं त्यांच्याकडून गटांगळ्या मारण्याचे काम चालू आहे.

Shahaji Patil-Chandrakant Khaire
एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी : रामदेवबाबांच्या दाव्याने वादात भर

राज्यात दोन महिन्यांपूर्वी क्रांतीकारक घटना घडून नवीन सरकार स्थापन झाले आहे. वास्तविक हे सरकार अडीच वर्षांपूर्वीच बनायला हवे होते. पण काही राजकीय घटनांमुळे नैसर्गिक युतीचे सरकार बनू शकलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगल्या पद्धतीने सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये बाहेत. येत्या अडीच वर्षात हे सरकार लोकाभिमुख होईल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Shahaji Patil-Chandrakant Khaire
संभाजीराजे स्मारकाचा निधी रद्द करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला अशोक पवारांचा इशारा

मी माझ्या मतदासंघातील कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लावली आहेत. प्रत्येक आमदारांच्या काही अपेक्षा असतात. एखाद्या मतदारसंघाच्या शेजारी मोठे चांगले काम मंजूर झाले की आपल्याही मतदारसंघात असं काम व्हावं, आमदाराला वाटत असतं. सुहास कांदे यांना वाटलं असेल की त्या आमदाराचा काम झालं, माझं राहिलं. एकादं काम करून घेण्यासाठी आमदाराचा पाठपुरावाही महत्वाचा असतो. आपण पाठपुरावा करून संबंधित कामे मार्गी लावून घेतली पाहिजेत, असे उत्तर शहाजी पाटील यांनी या सरकारवर अनेक आमदारांची नाराजी आहे का,या प्रश्नावर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com