
पिंपरीः महाराष्ट्रातील शेतकरी आणि बैलगाडाप्रेमींच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज आहे. शेतकऱ्यांच्या सदिच्छा आणि राज्य सरकारच्या मदतीच्या जोरावर ही न्यायालयीन लढाई निश्चितपणे जिंकू,असा विश्वास ही शर्यत सुरु होण्यासाठी प्रयत्न करीत असलेले व त्याकरिता आज दिल्ली गाठलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
कायद्याच्या चौकटीत राहून ही स्पर्धा व्यवस्थित पार पडेल हा विश्वास आहे. त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागेल, असे बैलगाडाप्रेमी आमदार लांडगे म्हणाले. आपली संस्कृती आणि शेतकऱ्यांचा खेळ टिकावा म्हणून खंडेरायालाही साकडे घातले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने आणि इतरही राज्यांनी यासाठी चांगले वकील दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात विशेष लक्ष घातले असून, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून दाखल झालेल्या केसचा संपूर्ण खर्च ते करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आमदार लांडगेसह बैलगाडा शर्यतीचे पदाधिकारी, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारीही कालपासून दिल्लीत आहेत. बैलगाडा शर्यतीत गोळीबार झाल्याच्या बातम्या चुकीच्य्या असून, घटना घडली तिथे बैलगाडा शर्यत नव्हती, तर वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचे लांडगे यांनी यावेळी स्पष्ट केले. या खटल्यात महाराष्ट्र सरकारकडून ॲड. तुषार मेहता, सिध्दार्थ भटनागर, सिध्दार्थ धर्माधिकारी, आदित्य पांडे, आभिकल्प प्रताप सिंह, श्रीरंग वर्मा युक्तीवाद करीत आहेत. तर बैलगाडा संघटनेची बाजू ॲड. गौरव अग्रवाल मांडणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.