Chandrashekhar Bawankule News: येत्या आठ महिन्यात ठाकरेंकडे चारच लोक राहतील; बावनकुळेंचा दावा

Bawankule and Thackeray : ''शिवसेनेत बंडखोरी झाली ही फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळेच...''
Chandrashekhar Bawankule and 
Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule and Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Politics : ''शिवसेनेत बंडखोरी झाली ही फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळेच. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांना त्यांच्या मुलाला मंत्री करायचे होते. त्यामुळे ते राष्ट्रवादी, काँग्रेसबरोबर गेले. पण तिकडे गेले तरीही त्यांनी मंत्र्यांना, आमदारांना वेळ दिला नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे पुढच्या आठ महिन्यात फक्त चारच लोक राहतील'', असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे 'साम टीव्ही'च्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना फक्त चारच लोकं राहतील, असा दावा त्यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Chandrashekhar Bawankule and 
Uddhav Thackeray
BJP News : भावूक होत भाजपच्या 'या' बड्या नेत्याने घेतली राजकारणातून निवृत्ती

बावनकुळे म्हणाले, ''शिंदे आणि आमची युती नैसर्गिक आहे. उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या ट्रॅपमध्ये येऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यांच्या मुलाला मंत्री केलं, पण हे सर्व निसर्गाला मान्य नव्हतं. सध्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विकास होतो आहे. महाविकास आघाडीच्या काळात फक्त सत्ता आणि पैसे, पैसे आणि सत्ता हेच धोरण त्यांचं होतं'', असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर प्रहार केला.

Chandrashekhar Bawankule and 
Uddhav Thackeray
Bawankule On Ajit Pawar : राष्ट्रवादीत अजित पवारांवर अन्याय : बावनकुळेंनी वात पेटवली

''शरद पवारांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असं कधीही वाटत नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राचे व्हिजन आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच भाजप राज्यात मोठा पक्ष झाला. कारण 124 नंतर 105 आमदार फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडून आले. पण राष्ट्रवादीला 70 आमदार देखील निवडून आणता आले नाहीत'', असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

Chandrashekhar Bawankule and 
Uddhav Thackeray
Kasba By-Election : लोकसेवा असो किंवा निवडणूक आयोग निकालाला महत्त्व : मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान !

''आज खोके-खोके करता पण त्यावेळी तुम्ही मंत्रालयात बसले असता तर आज ही वेळ आली नसती. अजित पवार हे मंत्रालयात बसायचे पण आदित्य ठाकरे यांनी असे का नाही केले. ते तर फक्त उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फिरायचे. त्यांनी सरकारही फेसबुकवर चालवलं. आताही ते फेसबुकवर बोलतात. पण त्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे त्यांच्याकडे चारच लोकं राहतील'', असा टोला बावनकुळे यांनी ठाकरेंना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com