MPSC Students Protest : 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच; शेकडो विद्यार्थ्यांनी रात्र रस्त्यावर काढली

Students Protest: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परिक्षा जु्न्या अभ्यासक्रमानुसारच घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
MPSC Students Protest
MPSC Students ProtestSarkarnama

Pune News : नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करावी, या मागणीसाठी एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांनी पुण्यात कालपासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सुमारे 1000 विद्यार्थी झाशी राणी चौकात कालपासून उपोषण करत आहेत.

रात्रभर कडाक्याच्या थंडीतही हे सारे विद्यार्थी आंदोलन स्थळी बसून आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला युवक काँग्रेस संपूर्णपणे सहकार्य करीत आहे. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सोमवारी अनेक नेत्यांनी भेट दिली.

MPSC Students Protest
CM Eknath Shinde : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार पक्षप्रमुख !

या संदर्भात बोलताना सोमवारी पुण्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. त्यांच्या मागण्या मान्य होतील. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र देण्यात आले आहे. 2025 पासूनच नवा अभ्यासक्रम लागू व्हावा अशी आमची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परिक्षा जु्न्या अभ्यासक्रमानुसारच घ्यावी, या मागणीसाठी आज पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी बालगंधर्व रंगमंदिराजवळ आंदोलन सुरु केले आहे. युवक काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एमपीएससी परिक्षेचा अभ्यासक्रम बदलला आणि राज्यात याबाबतच्या आंदोलनांना सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा’ या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली तर यानंतर एमपीएससी आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे बदल हा २०२३ पासूनच लागू करावा या साठीही विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.

MPSC Students Protest
MPSC Exam : पुण्यात MPSC उमेदवार पुन्हा रस्त्यावर ; 'नाना पटोले, अतुल लोंढे..'

राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससी उमेदवारांतर्फे ३१ जानेवारी रोजी ‘अराजकीय साष्टांग दंडवत’ आंदोलन करण्यात आले होते. पुण्यातील अलका टॉकिज चौकात हे आंदोलन केलं होत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे दोनवेळा आंदोलन करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com