...तर सरकार कसे चालवायचे? : अजित पवारांचा सवाल

काहीजण आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आडमूठेपणाची भूमिका घेत जनतेला वेठीस धरत आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

माळेगाव (जि. पुणे) : महावितरण कंपनी अर्थिक स्थितीमुळे डबघाईला आल्याने त्यांनी वीजबिल भरणा होण्यासाठी राज्यात कठोर भूमिका घेतली आहे. वीज खंडीत झाल्याने अनेक ठिकाणी आंदोलने झाली. तशीच स्थिती एसटीबाबत आहे. विजेचा प्रश्न असो अथवा एसटीचा असो. सरकार संबंधित महामंडळांना अर्थिक मदत करीत आहे. यापुढेही मदत करायला आम्ही सरकारपातळीवरून हात आखडता घेणार नाही. पण, काहीजण आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आडमूठेपणाची भूमिका घेत जनतेला वेठीस धरत आहेत. सर्वांनीच असे केले तर सरकार (government) कसे चालवायचे, असा सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांना दंड, व्याज न भरता थकीत आणि नियमित बिले भरावीत, असे आवाहन केले. (How to run a government? Deputy Chief Minister Ajit Pawar's question to agitators)

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राजहंस सहकार संकुलाच्या इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी अजित पवार सोमवारी (ता. ६ डिसेंबर) बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे होते. दरम्यान, बारामतीसह सर्वत्र रस्ता रुंदीकरणासह अनेक सरकारी कामे वेगात सुरू आहेत. परंतु काहींनी पैसे उकळण्याचे प्रकार सुरू केले आहेत. याकडे लक्ष वेधत पवार म्हणाले, ‘‘केंद्र व राज्य सरकार आपल्या भागातील पालखी मार्ग, महामार्ग, राज्यमार्गाचे रुंदीकरण करीत आहे. संबंधित रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागेचा, घर, विहिरींचा सरकार मोबदला देत आहे. मोबदला मिळतो म्हणून अनेकांनी पालखी मार्गालगत आंबा, नारळाची झाडे लावून पैसे उकळल्याची माहिती पुढे आली आहे. अरे बाबांनो, सरकारकडे काय नोटा छापायची मशीन नाही. सरकारला लुटू नका, शेवटी होणारी विकास कामे ही तुम्हा जनतेच्या भल्यासाठी होत आहेत.’’

Ajit Pawar
महाआरती करायला निघालेल्या भाजप शहर-जिल्हाध्यक्षाला अटक

नीरा डावा कालव्याचे शहर अथवा गावाच्या ठिकाणी अस्तरीकरण करण्याचे नियोजन आहे. यापुढील काळात या कालव्याची पाणी वहनक्षमता दुप्पट करण्याच्या उद्देशाने जुने पूल पाडून नवीन २४ प्रशस्त पूल उभारणीचे काम हाती घेतले आहे. हे काम पुर्णत्वाला आल्यानंतर शेतकऱ्यांना कमी कालावधीत पुरेसे पाणी शेती सिंचन, शेततळी, साठवण तलाव भरण्यासाठी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवकाळी पाऊस झाला, परंतु शेतकऱ्यांचे त्यामध्ये खूप नुकसान झाले. हे जरी खरे असले तरी धरण साठ्यातील चार टीमएमसी पाण्याची बचत झाली आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये सिंचनासाठी पाणी कमी पडणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
माजी आमदार सूर्यकांत दळवींकडे शिवसेनेची निवडणुकीसाठीची सूत्रे?

राजहंस सहकारी संकुलाच्या स्थापनेपासून आजवरच्या कार्याचा आढावा रणजित तावरे यांनी घेतला. या वेळी नगराध्यक्षा पैर्णिमा तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संभाजी होळकर, योगेश जगताप, विश्वास देवकाते, केशवराव जगताप, दत्तात्रेय येळे, मदनराव देवकाते, सुनील पवार, नीता फरांदे, रोहित कोकरे, विलास तावरे, धनवान वदक आदी उपस्थित होते. प्रस्ताविक रणजित तावरे यांनी केले. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव तावरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com