आशादायक : राज्यात १४ जिल्ह्यात आज एकही नवा रूग्ण नाही

राज्यात दिवसभरात 889 नवीन रुग्णांचे निदान झाले.
Corona
Corona Sarkarnama

पुणे : कोरोनाच्या उद्रेकानंतर तब्बल वीस महिन्यातील आशादायक बातमी सोमवारी पुढे आली. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनची एका दिवसातील सर्वांत कमी रुग्णसंख्या राज्यात आज नोंदली गेली.राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या एकाही रुग्णाचे निदान झाले नाही. पुणे, ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात कोरोनाबाधीताच्या मृत्यूची नोंद दिवसभरात झाली नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

कोरोनाच्या दोन लाटांचा भयंकर अनुभव राज्याने घेतला. राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात गेल्या वर्षी 9 मार्चला आढळला. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली. सुमारे सहा महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये राज्यात एका दिवशी नव्याने निदान होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक नोंदली गेली.

Corona
पुण्यातील नगरसेवकांची संख्या जाणार १८३ वर ?

फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख उतरता होता. पण, त्यानंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. ही कोरोनाची दुसरी लाट ठरली. गेल्या वर्षी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून उच्चांकी रुग्णसंख्येचा आकडा गाठण्यासाठी सहा महिने लागले होते. दुसऱ्या लाटेचा तडाखा इतका मोठा होता की, अवघ्या तीन महिन्यांमध्ये दुसऱ्या लाटेतील कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. राज्यात दिवसभरात 889 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आतापर्यंतची एका दिवसातील सर्वांत कमी रुग्णसंख्या असल्याची, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

राज्यात एकाही रुग्णाची नोंद नाही

राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये दिवसभरात एकाही रुग्णाला कोरोनाचे निदान झाले नाही. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मारा-भाईंदर, परभणी, लातूर, चंद्रपूर महापालिकांमध्ये नव्याने एकही रुग्ण आढळला नाही. धुळे, जळगांव, नंदूरबार, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णाची नोंद झाली नसल्याचे आरोग्य खात्याने सांगितले.

Corona
पटोलेंचा इशारा; आता नुरा कुस्ती चालणार नाही

येथे नोंदली एक अंकी रुग्णसंख्या

राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येचा आकडा एकाच अंकात नोंदला गेला. त्यात कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, अकोला, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये नऊपेक्षा कमी रुग्ण आढळले.

चार जिल्ह्यांत बारा मृत्यू

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे आणि रत्नागिरी हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात एकाही कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबई महापालिकेत 7, नवी मुंबई महापालिकेत 1, पुणे आणि रत्नागिरी येथे दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

- राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण : 23 हजार 184

- सर्वांत जास्त अॅक्टिव्ह रुग्ण : 6 लाख 99,858 (22 एप्रिल 2021)

- रुग्ण बरे होण्याचा दर : 97.47 टक्के

- पहिल्या लाटेत एका दिवसात निदान झालेले सर्वाधिक रुग्ण : 24 हजार 886 (11 सप्टेंबर 2020)

- दुसऱ्या लाटेत एका दिवसात निदान झालेले सर्वाधिक रुग्ण : 68 हजार 631 (18 एप्रिल 2021)

- राज्यातील एकूण कोरोनाबाधीत : 66 लाख 38 हजार 050

- बरे झालेले रुग्ण 64 लाख 37 हजार 025

- मृत्यमुखी पडलेले रुग्ण : 1 लाख 40 हजार 028

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com