गडकरीसाहेब ! मी तुमच्या घरचा कढी भात खाल्लाय !

सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन तसेच लोकार्पण सोहळा आज सोलापूर येथे पार पडला.
 Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

पुणे : सात वर्षापूर्वी आमदार म्हणून निवडून अल्यानंतर इंदापूरच्या रस्त्याच्या कामासाठी अजितदादांबरोबर तुमची भेट घेण्यासाठी दिल्लीला तुमच्या घरी आलो होतो. एका फटक्यात तुम्ही २५ कोटी रूपयांचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला. जेवण केल्याशिवाय जायचे नाही, असा आग्रह करीत जेवायला घातले. मी तुमच्या घरचा कढी-भात खाल्लाय अशी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आठवण सांगत सोलापूरचे पालकंमत्री दत्तात्रय भरणे यांनी गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले.

 Nitin Gadkari
हा तर भाजप अन् संघाचा डाव! जामिनावर सुटताच जिग्नेश मेवानींचा गौप्यस्फोट

सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन तसेच लोकार्पण सोहळा आज सोलापूर येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री भरणे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कामाच्या पद्धतीने तोंड भरून कौतुक केले. काम करताना पक्षीय राजकारण न पाहता जो येईल त्याचे काम करणारे शरद पवार व नितीन गडकरी हे दोन नेते महाराष्ट्रात आहेत, असे भरणे यांनी सांगितले. गेल्या सात वर्षात जिल्ह्यात रस्त्यांची कामे झपाट्याने झाली आहेत. अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत.अजून खूप कामे होणे बाकी आहे. नितीन गडकरी यांच्या विकासाच्या दृष्टीकोनामुळेच ही कामे होऊ शकली आहेत, असे भरणे यांनी सांगितले.

 Nitin Gadkari
मंत्री गडाखांच्या पीए वर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक

सोलापूर जिल्हातील १६४ कोटी रूपये किमतीच्या ४२ किलोमीटर लांबीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन झाले. याशिवाय आठ हजार १७ कोटी रुपये किमतीच्या 250 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आज गडकरी यांच्या हस्ते झाला.यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, ‘‘ गेल्या सात वर्षापासून रस्ते वाहतूक विभागाचा मंत्री म्हणून काम करतोय. सात वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची एकुण लांबी ६२० किलोमीटर होती. गेल्या सात वर्षात या रस्त्यांची लांबी एक हजार सातशे किलोमीटर झाली आहे. या वाढीचा दर १७३ टक्के इतका आहे.’’

जिल्ह्यात उसाच्या प्रश्‍नावर बोलताना गडकरी यांनी यापुढे केवळ साखर उत्पादनासाठी ऊस लावाल तर ऊसवाल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. उसापासून इथेनॉल निर्मिती करा तरच ऊस शेती भरवशाची राहील, असा सल्ला गडकरी यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘ शंभर टक्के इथेनॉलवर चालणारे फ्लेक्स इंजिन आता तयार झाले आहे. बहुतांश दुचाकींना ते इंजिन यापुढील काळात बसणार आहे. त्यामुळे इथेनॉलची निर्मिती शेतकऱ्यांनी फायद्याची होऊ शकते.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com