मंचर (जि. पुणे) : ''महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांची कामगीरी मोठी आहे. परंतु काही लोकांना त्यांच्या कार्याची ओळख नसल्यामुळे महामानवांना टीकेचे लक्ष केले जाते. ही दुर्दैवी बाब आहे. राजकीय नेत्यांनी व्यासपीठावरून बोलताना तारतम्य ठेवावे,'' असं म्हणत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी राजकीय नेत्यांना टोला लगावला.
मंचर (ता.आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त व रयत शिक्षण संस्था सुवर्ण महोत्सवी योगदानानिमित्त राज्यस्तरीय महाविद्यालयीन ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी वळसे पाटील बोलत होते.
वळसे पाटील म्हणाले, ''आज भारतीय राज्य घटनेच्याबाबतीत काही जणांकडून मोडतोड केली जाते. समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. यामधून व्यापक राष्ट्रवाद ऐवजी संकुचित प्रादेशिक वाद उफाळला जात आहे. पण राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाणार नाही याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी नेहमीच सर्वांगीण विकास कामांना व राष्ट्रीय एकात्मतेला सतत प्राधान्य दिले त्यांचा आदर्श हा समाज हिताचा आहे'', असं ते म्हणाले.
''विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धिंगत झाले पाहिजे. वक्तृत्व स्पर्धेसाठी ''ओवी गाऊ विज्ञानाची'' व निबंध स्पर्धेसाठी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" या विषयावर स्पर्धा घ्यायला हव्या. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा आणि कर्मकांड यामध्ये अडकलेल्या समाजाला विज्ञाननिष्ठ करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. त्यामधून सामाजिक उत्तरदायित्व व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,'' असंही वळसे पाटील म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.