Devendra Fadanvis: शेतकऱ्यांची नापीक जमीन भाड्याने घेऊन काय करणार? फडणवीसांनी दिलं उत्तर

आज आपल्याकडे गटशेतीशिवाय पर्याय नाही.
Devendra Fadanvis:
Devendra Fadanvis:Sarkarnama

Devendra Fadanvis : आपल्या जमीनीत फारसं काही पिकत नसेल, जमीन नापीक असेल तर तुमची शेती ३० वर्षांसाठी भाड्याने घ्यायला आम्ही तयार आहोत. शेतीची मालकी तुमचीच असणार आहे. आम्ही वर्षाला ७५ हजार रुपये तुम्हाला जमीनीचं भाडं देऊ आणि दरवर्षी त्यात दोन टक्क्यांनी वाढही करुन देऊ. तीस वर्षात तुमच्या शेतीचा वापर सोलर करता करु, तीस वर्षांनी तुमची शेती तुम्हाला परत करु. अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. ते पुण्यात पाणी फांऊडेशनच्या कार्यक्रमात बोलत होते.

त्यामुळे जर तुमची जमीन नापीक असेल, त्यात फारसं काही येत नसेल, घरी शेती करायला कोणी नसेल तर अशी शेती आम्हाला भाड्याने दिली तर दोन पैसे तुम्हालाही मिळतील. त्यातून शेतकऱ्याला सोलारची वीजही मोठ्या प्रमाणात मिळेल. हे वर्ष खुप महत्त्वाचं वर्ष आहे. गेली तीन वर्ष महराष्ट्राने अतिवृष्टी पाहिली. पण अलीकडेच आलेल्या अॅडव्हान्स वेदर रिपोर्ट पाहता आपल्याला सर्वांना तयारीत राहायचं आहे. कारण हे अल् निनोचं वर्ष आहे. अल् निनोच्या वर्षात पाऊस कमी होतो.

Devendra Fadanvis:
Devendra Fadanvis: शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; जलयुक्त शिवार २ टप्पा सुरु करणार

आज आपल्याकडे गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे बार्गेनिंग पावर वाढली आहे. या गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा, नवीन पद्धतीचा वापर करण्याची क्षमता तयार झाली आहे. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मागच्या काळात आपण योजना आणली होती. या गटांना आपण एक कोटी रुपयांपर्यंतची मदत आपल्या सरकारने दिली.

मोठ्या प्रमाणात गट तयार झाले. आता तुमची ही गटशेतीची व्यवस्था पाहून या गटशेतीसाठी पुन्हा एकदा नवीन योजना सुरु केली पाहिजे, असं मला वाटतयं. त्यामुळे नव्याने गटशेतीची योजना आम्ही सुरु करु. असही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. तसेच, आपण शेतीक्षेत्रासाठी नव्याने कौशल्य प्रशिक्षण सुरु केलं आहे. आपल्या कृषी महाविद्यापीठाच्या माध्यमातून जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना आपण कृषी कौशल्यांमध्ये प्रशिक्षण दिलं आहे. येत्या काळात अशाच प्रकारचं ट्रेनिंग मोठ्या प्रमाणात दिलं जाणार आहे. असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांची मागणी असते की, आम्हाला दिवसा १२ तास वीज मिळावी. त्यासाठी आता आपल्याकडे जेवढे अॅग्रीकल्चरल फीडर आहेत ते सर्व सोलरवर आणण्याचा निर्णय़ आम्ही घेतला आहे. याच वर्षी तीस टक्के फिडर सोलरवर आणण्यासाठी काम हाती घेतल आहे. हे सर्व फिडर सोलरवर आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल. याचा पहिला प्रयोग आपण २०१७ साली राळेगणसिद्धीला केला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावी केला होता आणि तो यशस्वीही झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com