हमीद दाभोलकरांनी 'सीबीआय'बद्दल व्यक्त केली 'ही' खंत

२० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. या काळात सीबीआयने अनेकांना अटक केली. मात्र, हत्येच्या सूत्रधाराला सीबीआय अद्याप पकडू शकलेली नाही आणि खुल्या विचारांच्या व्यक्तींसाठी हे धोक्याचे आहे, असे डाॅ. हमीद दाभोलकर यांनी म्हटले आहे.
Dr Narendra Dabholkar
Dr Narendra Dabholkar

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय गेली सहा वर्षे करत आहे. पण अद्याप पर्यंत या हत्या प्रकरणाच्या सूत्रधाराला सीबीआय पकडू शकलेली नाही, अशी खंत डाॅ. दाभोलकर यांचे पूत्र डाॅ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे.

२० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. या काळात सीबीआयने अनेकांना अटक केली. मात्र, हत्येच्या सूत्रधाराला सीबीआय अद्याप पकडू शकलेली नाही आणि खुल्या विचारांच्या व्यक्तींसाठी हे धोक्याचे आहे, असे डाॅ. हमीद दाभोलकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडं सोपविलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॅा. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाच्या चैाकशीची सीबीआयला आठवण करून दिली आहे.  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयद्वारे सुरू असलेल्या चौकशीप्रमाणे सुशांत प्रकरणाची परिणती होऊ नये, असे शरद पवार यांनी सांगितले. याबाबत शरद पवार यांनी ट्विट केलं आहे. 

आपल्या टि्वटमध्ये शरद पवार यांनी म्हटलं आहे की मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही. 

सुशांत प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे व्हायला हवाच. त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात काही शंका असतील तर त्यावर प्रकाश पडायलाच हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पण प्रश्न आहे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा व त्यांच्यावर सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीचा. कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करणार असतील तर त्यांना रोखावेच लागेल. सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळायलाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्य व न्यायाच्या मार्गावर असतानाच त्यांना रोखले हे बरोबर नाही,' अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना' तून व्यक्त केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com