महाविकास आघाडी गेली तरच महाराष्ट्राचा विकास : भागवत कराड

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री Union Minister of State for Finance भागवत कराड Bhagwat Karad आज पुण्यात Pune चेंबर ऑफ कॉमर्स Chember of Commerce उदयोगपतींच्या industrialists बैठकीस Meeting व भाजपच्या BJP कार्यक्रमास उपस्थित होते.
Central Minister Bhagwat Karad
Central Minister Bhagwat Karadsarkarnama

पुणे : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालात चार ठिकाणी भाजप निवडून आलंय, याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत भाजपच निवडून येणार आहे. महाविकास आघाडी गेली तरच महाराष्ट्राचा विकास होईल. केव्हा कुठलं सरकार ठेवायचं हे जनता ठरवेल, असे स्पष्ट मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आज पुण्यात चेंबर ऑफ कॉमर्स उदयोगपतीच्या बैठकीस व भाजपच्या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी केंद्र सरकारचे बजेट आणि महाराष्ट्र सरकारने आज जाहीर केलेल्या बजेटची तुलना करताना महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. भागवत कराड म्हणाले, भारताचे बजेट ३९.३५ लाख इतके असून एकत्रित सर्व बजेट सर्वसामान्यासाठी आहे.

Central Minister Bhagwat Karad
औरंगाबाद शहरात मेट्रो लाईन साठी प्रयत्न; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड,पाहा व्हिडिओ

महाराष्ट्राचे बजेट मी ऐकलं नाही. महाराष्ट्र सरकार घोषणा करण्यात पक्के असून घोषणा करून करत काही नाही. दिवाळीच्या काळात केंद्राने पेट्रोल, डिझेल दर कमी केले. पण, राज्य सरकारने यात काहीच केलं नाही, त्यामुळे पेट्रोलियममध्ये काही कर कमी नाही. मूलभूत सुविधा वाढवी अशी कुठलीच योजना महाराष्ट्र सरकारने केलेली नाही.

Central Minister Bhagwat Karad
भागवत कराड यांनी दिले दोंडाईचाला ५० कोटी गिफ्ट!

या बजेटमध्ये महाराष्ट्राचा जीडीपी १२ असेल तर चांगलाच आहे. केंद्राचा जीडीपी दर नऊ आहे केंद्र सरकार सर्व राज्यांना पैसे देत. युक्रेन आणि रशिया युद्धामुळे पेट्रोल, डिझेल दर वाढतील, असे सांगितले जाते. यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आम्ही भाव वाढवून देणार नाही. त्यावर एक केंद्रीय मंत्र्याची टीम काम करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Central Minister Bhagwat Karad
Video: आर्थिक निकषांवर आरक्षण देऊन टाका; उदयनराजे भोसले

केंद्र सरकार उदयोग जगतावर पाच लाख कोटी खर्च करणार आहे. १४ वेगवेगळे प्रोजेक्ट देणार आहे, याची माहिती देण्यासाठी आजची बैठक घेतल्याचे त्यांनी नमुद केले. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालात चार ठिकाणी भाजप निवडून आलंय, याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल का, या प्रश्नावर श्री. भागवत कराड म्हणाले, त्याचे आत्ताच सांगता येणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत भाजपच निवडून येणार आहे. महाविकास आघाडी गेली तरच महाराष्ट्राचा विकास होईल. केव्हा कुठलं सरकार ठेवायचं हे जनता ठरवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com