संरक्षण मंत्री राजनाथसिंहांनी दिले नव्या वादाला निमंत्रण  

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायकआहेत
rajnathsinh.jpg
rajnathsinh.jpg

पुणे : राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिल्यामुळे शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घडलें आणि राष्ट्रनायक झाले, असे म्हणत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नव्या वादंगाला शुक्रवारी आमंत्रण दिले.(Defense Minister Rajnath Singh invites new controversy)

 छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात फक्त राजमाता जिजाबाई यांचाच सहभाग असल्याचे राज्यातील अनेक मराठा संघटनांचे म्हणणे आहे. समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचा महाराजांना घडविण्यात काहीही सहभाग नाही, असेही संघटनांचे म्हणणे आहे. या मुद्द्याभोवती महाराष्ट्रातील राजकारण अनेक दिवस फिरत होते. त्यामुळे हा मुद्दा भावनिकही झाला आहे.

या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज हा मुद्दा महाराष्ट्रात संवेदनशील आहे, याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना  पुण्यात येताना नव्हती का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कोणतेही केंद्रीय मंत्री देशाच्या विविध भागात प्रवास करतात. त्यावेळी स्थानिक मुद्द्यांची पूर्वमाहिती घेऊन त्या बाबत ते वक्तव्य करतात. परंतु, पुण्यात येताना राजनाथसिंह यांना शिवाजी महाराजांना कोणी घडविले, त्याबद्दलचे वाद-प्रवाद याबद्दलची माहिती कोणी दिली नाही का, या बाबतही चर्चा सूरू झाली आहे. 

राजनाथसिंह भाषणाच्या ओघात खेळाचे महत्त्व स्पष्ट करताना, छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले ते बरोबर आहे. राजमाता जिजाबाईंचाही उल्लेख बरोबर आहे. परंतु, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख समोयोचित होता का, या बद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक
 खेळाला खूप महत्त्व आहे, याचे सर्वांत चांगले उदाहरण महाराष्ट्रात आहे. शिवाचा छत्रपती शिवाजी महाराज होण्यामागे खेळ हा घटक आहे.त्यांना जिजामाता जिजाबाई,समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिले आणि ते राष्ट्रनायक झाले, असे राजथासिंह यांनी सांगितले.

नीरज चोप्रा स्टेडियम
 ‘‘लष्करातील खेळाडूंनी बजावलेल्या अतुलनीय कामगिरीने युवा पिढी खेळाकडे निश्चितच आकर्षित होणार आहे,’’ अशी आशा व्यक्त करत मंत्री राजनाथसिंह म्हणाले, ‘‘स्टेडियमला नीरज चोप्रा यांचे नाव देऊन खेळांडूप्रति स्नेह, सन्मान आणि आदरभाव व्यक्त होत आहे. रामायण, महाभारत काळात युद्धविद्या हा पाठ्यक्रमाचा भाग होता. तलवारबाजी, भालाफेक शिकविले जात. नालंदा, तक्षशिला विद्यापीठात त्यावेळच्या परदेशातून खेळाडू शिकायला येत असत.’’

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com