चंद्रकांतदादा म्हणाले; मंत्रीमंडळातील काहीजण जात्यात तर काहीजण सुपात !

ज्यांनी चुकीची कामे केली त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल. त्यामुळे संजय राऊत यांनी काहीही टीका केली तरी केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचे काम करत राहतील.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

पुणे : राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांपैकी काहीजण जात्यात तर काहीजण सुपात आहेत. काही मंत्री तर बॅगा भरून बसले आहेत.ज्यांनी चुकीची कामे केली त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल. त्यामुळे संजय राऊत यांनी काहीही टीका केली तरी केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचे काम करत राहतील, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज सांगितले.

Chandrakant Patil
राज्यात आणखी एक शिवसैनिकाची आत्महत्या

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून सातत्याने टीका होत असल्याच्या पाश्‍र्वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना पाटील म्हणाले, ‘‘ काहीही झाले तरी ‘सामना’तून टीका होतेच. त्यामुळे मी सामना वाचणे बंद केले असून राऊत यांच्या कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही.‘एसटी’च्या संपावर तोडगा काढण्याची अनेकवेळा विनंती केली. मात्र, सरकार मार्ग काढायला तयार नाही. गिरणी कामगारांच्या संपामुळे त्यावेळी मुंबईतील एक लाख कुटुंब उध्वस्त झाली. एसटी कामगारांची तितकीच कुटुंब आहेत. त्यामुळे एसटी कामगारांचा संप तातडीने मिटविण्याची गरज आहे.’’

Chandrakant Patil
महागाईचा भडका, गॅस सिलेंडर खांद्यावर घेऊन शिवसैनिकांचा मोदी सरकार विरोधात आक्रोश...

सांगलीतील अहिल्यादेवी स्मारकाच्या उद्‌घाटानाचा संदर्भ देऊन पाटील म्हणाले, ‘‘ या स्मारकाचे उदघाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. आमचा आक्षेप पवारांना नाही. मात्र, सांगली महापालिकेत दगाफटका करून महापौरपद विरोधकांनी मिळविले. इतर सारी पदे भाजपाच्या ताब्यात आहेत. महापालिकेतील सत्ता भाजपाच्या ताब्यात असताना कार्यक्रमासाठी भाजपाच्या राज्यपातळीवरील कोणत्याही नेत्याला न बोलावता केवळ शरद पवार यांन निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला अडचण येऊ नये म्हणून पोलिसांमार्फत दबाव आणला जात आहे.१४४ कलम लागू करण्यात आले आहे. राज्य सरकार पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’’

पोलिसांवर दबाव आणून भाजपा कार्यकर्त्यांच्या जुन्या केस उघडून कारवाई करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात दिवस-दिवस थांबवून ठेवण्यात येत आहे.मात्र, कोणीच कायस्वरूपी सत्तेत नसतात. काल आम्ही होतो. उद्या पुन्हा आम्ही येऊ शकतो हे ध्यानात घेऊन पोलिसांनी काम करावे, असा इशारा पाटील यांनी पोलिसांना दिला. पोलिसांकडून आनावश्‍यक त्रास सुरूच राहिला तर प्रसंगी पोलीस ठाण्यांना घेराव घालावा लागेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com