राज्यात भाजपचे सरकार कधी येणार? : चंद्रकांतदादांचे आत एक बाहेर दुसरेच...

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'सत्यमेव जयते' म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना लिहिलेले पत्र बुधवारी सकाळी ट्विट केले.
Bjp Leader Chandrakant Patil
Bjp Leader Chandrakant PatilSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'सत्यमेव जयते' म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना लिहिलेले पत्र बुधवारी सकाळी ट्विट केले. या पत्रात राऊत यांनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ईडी (ED) मार्फत दबाव आणला जात असल्याचे, राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी १० मार्चनंतर राज्यत भाजपचे सरकार येणार असल्याचे सांगितेल.

पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, १० मार्चनंतर राज्यात सत्ता परिवर्नन होईल. या विषयी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, ते आपण कार्यकर्त्यांचे मन राखण्यासाठी बोललो असे सांगितले. यावेळी ते म्हणाले, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. माजी खासदार किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. या परिस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यात सत्तेचा दुरपयोग सुरु आहे. सोमय्यांवर हल्ला झाला. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी १० मार्चनंतर राज्यत सरकार येईल असे म्हणालो, असे पाटील यांनी सांगितले.

Bjp Leader Chandrakant Patil
...तर उद्या बच्चू कडूही भाजपमध्ये येतील..

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शहरात मेळावे सुरु आहेत. राज्यात सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा त्रास तळागाळातील कार्यकर्त्यांना होतो. त्यांनी माझ्याकडे काळजी व्यक्त केली. तेव्हा १० मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार येईल, असे मी सांगितले. कार्यकर्त्यांचे मन राखण्यासाठी तसे बोलावे लागते, असे पाटील म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले आहे. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असा दावा राऊत यांनी पत्रात केला आहे.

Bjp Leader Chandrakant Patil
राऊतांचं उपराष्ट्रपतींना चार पानी पत्र अन् त्यावर आदित्य ठाकरेंकडून एकच शब्द...

माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात. असेही राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि परिचित यांना धमकावण्यास आणि त्यांचा छळ करण्यात येत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे. 2012-2013 मध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला अशीच छोटी जमीन विकणाऱ्या इतर लोकांसोबतही हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस ईडी आणि इतर एजन्सींचे कर्मचारी या लोकांना फोन करतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी देत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com