SC Decision On Bailgada Sharyat: बैलगाडा शर्यतीला परवानगी, पण सुरक्षेचं काय ? ; आढळरावांनी दिला सरकारला 'हा' सल्ला..

Bullock Cart Race Permission : ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार
Shivajirao Adhalrao Patil on Bullock Cart Race Permission :
Shivajirao Adhalrao Patil on Bullock Cart Race Permission :Sarkarnama

Shivajirao Adhalrao Patil on Bailgada Sharyat Permission : बैलगाडा शर्यतींसंदर्भातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला निकाल आज अखेर सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला.

बैलगाडा शर्यतीसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून हा निर्णय देण्यात आलेला आहे. राज्य सरकारचा महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा कायदा वैध ठरवण्यात आला आहे.

Shivajirao Adhalrao Patil on Bullock Cart Race Permission :
Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजप आव्हानं कशी पेलणार ?

शिवसेनेचे नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारला सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "वीस वर्षांपासून यासाठी संघर्ष सुरु होता. यापूर्वी अनेकवेळा बैलगाडा शर्यंतीवरील बंदी उठवण्यात येत होती, तत्कालीन बंदी घालण्यात येत होती. हे सुरु असताना आता सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा परिपूर्ण निकाल आहे.

"सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. खिल्लार बैलांची विक्री कमी होऊन त्यांच्या वंश वाढीस फायदा होईल. या बैलगाडा शर्यतींमुळे यात्रा-जत्रेतील लहान-मोठ्या व्यावसायिकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे," असे आढळराव म्हणाले.

Shivajirao Adhalrao Patil on Bullock Cart Race Permission :
Supreme Court : पुन्हा भिर्रर सुरु..; न्यायालयाच्या निकालावर खासदार कोल्हे म्हणाले..

वाढदिवसाच्या निमित्ताने शर्यंत नको..

आढळराव म्हणाले, "शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनात निखळ आनंद, गौरव देणारी बैलगाडा शर्यत असते. पण काही ठिकाणी या शर्यतींना बाजारुस्वरुप येते. वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या अशा शर्यतींवर बंदी घातली पाहिजे,"

कठोर कायदा करा..

"अशा शर्यंती घेणाऱ्यांनी बैल आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यांना दुखापत होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. या शर्यती पुन्हा सुरु होण्यासाठी राज्य सरकारने खूप मोठं संशोधन केले आहे. आता बैलांच्या सुरक्षेबाबत सरकारने कठोर कायदा केला पाहिजे," असे आढळराव म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com