आघाडीच्या 'टायटॅनिक'मध्ये कोण बसणार? आमची बोट सुरक्षित ; राणेंचा टोमणा

''महाविकास आघाडी सरकारच्या टायटॅनिकमध्ये कोणीही बसणार नाही. भाजपमधून कोणीही तिकडे जाणार नाही. कारण आमची बोट सुरक्षित आहे. इथून निघते थेट दिल्लीला जाते,"
Narayan Rane, Uddhav Thackeray
Narayan Rane, Uddhav Thackeraysarkarnama

पुणे : ''शिवसेना युपीएत (UPA)सहभागी झाली, तरीही काहीही फरक पडणार नाही, भाजपचे (bjp) ३०३ खासदार आहेत. शिवसेनेनं (shivsena) हिंदुत्वाशी गद्दारी केली असून त्यांनी बेईमानी करुन सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून टाकलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) काहीही बोलतात, त्यांचे महापालिकेत १० नगरसेवक आहेत, त्यांची देशात सत्ता येणार का,'' असा सवाल केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उपस्थित केला. ''फुगवून फुटतात, त्याला संजय राऊत म्हणतात,'' असा टोमणा त्यांनी यावेळी लगावला.

पुण्यातील सिम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत नारायण राणे बोलत होते. यावेली माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, ''महाविकास आघाडी सरकारच्या टायटॅनिकमध्ये कोणीही बसणार नाही. भाजपमधून कोणीही तिकडे जाणार नाही. कारण आमची बोट सुरक्षित आहे. इथून निघते थेट दिल्लीला जाते,"

भाजपचे नगरसेवक पक्ष सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार नाही. आमची बोट एकदम सुरक्षीत असून, इथून सुटली की सुरक्षितपणे थेट दिल्लीत थेट जाते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही बुडणारी टायटॅनिक आहे. या जहाजाला प्रत्येकजण आपापल्या बाजूने खेचत असल्याने या बुडणाऱ्या जहाजात कोणी बसणार नाही. तसेच शिवसेनेचे आता १० नगरसेवक आहेत, ते शून्य होतील, अशी टीका राणे यांनी केली.

''आगामी निवडणुकीत कसं काम करावं? कोणत्या स्वरूपाचं काम करावं? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम लोकांपर्यंत पोहोचवणे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पुन्हा एकदा महापालिकेत भाजपची सत्ता यावी या बुथ कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले,'' असे राणे यांनी सांगितलं. राज्याचे विधीमंडळाचे अधिवेशन कमी दिवसाचे घेता यावे यासाठी निर्बंध लादले लागते आहेत. दोन वर्ष कोरोनामुळे लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली असून, आत्ताच निर्बंध घालू नये.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी टि्वट केलं आहे. बाबरी मशिद पाडतानाचा एक फोटो नार्वेकर टि्वट केला आहे. अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) निर्माणासाठी बलिदान दिलेल्या शिवसैनिकांना त्यांनी नमन केलं आहे. पण या टि्वटमुळे ते भाजपच्या निशाण्यावर आले आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी नार्वेकर यांच्या या भूमिकेवर पुण्यातील कार्यक्रमात टीका केली आहे. ''अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन..'' असे टि्वट नावेर्कर यांनी केलं आहे. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अतिशय खोचक शब्दांत टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, ''मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का,'' असा खोचक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Narayan Rane, Uddhav Thackeray
गद्दारी कोणी केली? दिग्विजय सिंगांना ज्योतिरादित्य शिंदेंनी दिलं उत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com