'रूपालीताईंच्या घरी जाऊन मी विचारणार आहे की, महिलांना वाईन चालेल का?'

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे.
Rupali chakankar- chandrkant Patil
Rupali chakankar- chandrkant Patil Sarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्य शासनाने निकषानुसार मॉल, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा (wine) निर्णय जाहीर केला. याविरोधात विरोधी पक्ष भाजपकडून (BJP) व काही संघटनांकडून विरोध केला जात आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यातील महिला वर्गाने सकारात्मकतेने घेतला, अशी भूमिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) मांडली होती. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज (ता.10 फेब्रुवारी) मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली आहे. रुपालीताईंनी हा शोध लावला की महिलांनी वाईनला विरोध केला नाही. महिलांना वाईन चालेल का? हे मी त्यांच्यी घरी जाऊन विचारणार आहे, अश्या शब्दात त्यांनी चाकणकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

Rupali chakankar- chandrkant Patil
सोमय्या घसरून पडले की मॉब लिंचिंग? आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

पाटील म्हणाले, रुपाली चाकणकरांचे घराणे हे सुसंस्कृत आहे. मी आता त्यांच्या घरी जाऊन विचारतो की महिलांना वाईन चालणार आहे का? अण्णा हजारे हे 14 फेब्रुवारा पासून या निर्णयाविरोधात उपोषणाला बसत आहेत. बंडातात्यानी वादग्रस्त वक्तव्या बद्द्ल दिलगीरी व्यक्त केली मात्र, या निर्णयाविरोधात माझी लढाई मी सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. पण रुपालीताईंनी हा शोध लावला की महिलांनी वाईनला विरोध केला नाही, गावा-गावात महिला एकत्र येतात आणि उभी दारूची बाटली अडवी करण्यासाठी प्रयत्न करतात. पाच हजार वर्षात दारूड्याला आपल्या पोराने दारू प्यावी असे वाटले नाही. तर, चोराला आपल्या मुलाने चोऱ्या कराव्या असे वाटले नाही. तुम्ही एका पक्षाच्या पदाधिकारी आहात, तुम्ही एका सुसंस्कृत घरातील आहेत. त्यामुळे तुम्ही वाईनला विरोध करा, असे पाटील यांनी चाकणकरांना सुनावले आहे.

Rupali chakankar- chandrkant Patil
दोन वेळा तुरुंगात जाऊन आलात, आता तरी सुधरा! केसरकरांचा राणेंना शहाणपणाचा सल्ला

दरम्यान, चाकणकर यांनी वाईनच्या राज्यसरकारच्या निर्णयाबाबत म्हणाल्या होत्या की, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. शेतकरीहित, दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाच्या संकटामुळे राज्यात निर्माण झालेली आर्थिक तूट पाहता सरकारने हा निर्णय घेतला. याबाबत राज्यातून एकाही महिलेची आयोगाकडे तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे महिला वर्गाने हा निर्णय सकारात्मकतेने घेतल्याचे दिसते. असे वक्तव्य केले होते. चाकणकरांच्या याच वक्तव्यावरून पाटील यांनी त्यांच्यावर आज टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com