राष्ट्रवादीची मते फुटणार, हे ऐकताच अजितदादांनी डोक्याला हात लावला..

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यावर अजितदादांची थेट टिप्पणी
Ajit pawar
Ajit pawarSarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha election 2022) निमित्ताने अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. (Rajya Sabha election updates)

आंबेडकर यांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आज पिंपरी-चिंचवड येथे प्रश्न विचारला असता त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. लोकांनी आणि प्रश्न विचारणाऱ्यांनी पण माहिती घेऊन बोलले पाहिजे, असे म्हणत राज्यसभेचे मतदान हे खुल्या पद्धतीने होणार आहे. पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवून मतदान करायचे आहे. पक्षाचा आदेश नाही पाळला तर संबंधित आमदार अपात्र होऊ शकतो. अशा परिस्थितीत मते फुटतील असे वाटते का, असा प्रति सवाल त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला केला.

Ajit pawar
राज्यसभा निवडणूक : या नियमामुळे राष्ट्रवादीची दोन मते धोक्यात; 'मविआ'चे टेन्शन वाढले...

ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण ती झाली नाही, याबद्दल अजितदादांनी खंत व्यक्त केली. राज्यसभेच्या निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता यावे, यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पण, वरील दोघांना मतदान करू द्यायचे की नाही, याचा निर्णय न्यायालय देईल, असेही ते म्हणाले.

या निवडणुकीत प्रत्येक महत्वाचे असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेससाठी ही दोन मते आवश्यक असणार आहेत. त्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Ajit pawar
१९९८ ची राज्यसभा निवडणूक : काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पडला अन् शरद पवार आरोपांचे धनी झाले

प्रकाश आंबेडकर नक्की काय म्हणाले?

आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपचा राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न आहे. भाजपचे सहावे उमेदवार धनंजय मंडलिक हे राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार होते. साखर कारखानदारी आणि सहकाराचा त्यांना अभ्यास आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्याचा कसोशीने प्रयत्न चालवलेला आहे. धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळे प्रत्यक्षात भाजप-शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी झाली असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

राष्ट्रवादीला स्वत: चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांना निवडून आणावा लागेल. तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपने राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असे म्हटलं जाईल. राष्ट्रवादीला पूर्णपणे आव्हान देणं भाजपला सोपं जाईल. केंद्राच्या हातात इथेनॉलचं लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते. राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा घोडेबाजार होणार असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल. महाराष्ट्राची जनता हे पाहतेय, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com