शाहरुख-आर्यन माझं काहीही वाकडं करु शकणार नाही : विक्रम गोखले

गोखले यांनी कंगना राणावत (kangana ranaut) हिनं केलेल्या विधानाचा समर्थन केलं, तर शाहरुख खान (Shah Rukh Khan) व त्याचा मुलगा आर्यन खानवर ( Aryan Khan) त्यांनी हल्लाबोल केला.
Shah Rukh Khan, Aryan Khan,Vikram Gokhale
Shah Rukh Khan, Aryan Khan,Vikram Gokhalesarkarnama

पुणे : अभिनेते विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यात ब्राह्मण महासंघाच्यावतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलतांना गोखले यांनी अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) हिनं केलेल्या विधानाचे समर्थन केलं, तर अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) व त्याचा मुलगा आर्यन खानवर ( Aryan Khan) हल्लाबोल केला.

विक्रम गोखले यांनी मुंबई कुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ''देशाच्या बॉर्डरवर 21 वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख आणि आर्यन माझं काहीही वाकडं करु शकणार नाही,'' असे गोखले म्हणाले.

'१९४७ साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे,' असे विधान अभिनेत्री कंगना राणावत हिनं केलं आहे. तिच्या या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही तिच्या या विधानानाचा समाचार घेतला आहे. विक्रम गोखले यांनी मात्र, कंगनाच्या विधानाचे समर्थन केलं आहे. विक्रम गोखले म्हणाले, ''कंगना जे म्हणाली ते खरंय, मी तिच्या वक्तव्याचे समर्थन करतो,'' यावेळी गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची स्तृती केली.

Shah Rukh Khan, Aryan Khan,Vikram Gokhale
कार्तिकी यात्रा : लालपरीनं पाठ फिरविल्याने वारकऱ्यांसाठी रेल्वे आली धावून!

राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही, जे सत्तर वर्षात झालं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करीत आहेत. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र (BJP Shiv Sena alliance) आल्यास फार बरं होईल,'' असे मत विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) यांनी व्यक्त केलं.

''शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे, याबाबत मी पुढाकार घेतला आहे. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं,'' असे गोखले म्हणाले. ''मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विक्रम गोखले म्हणाले, ''कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही, ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे ? माझ्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही,''

*लाल बहादूर शास्त्री सोडून मी देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो, पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते, ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो.किती वर्षे कारस्थान आहे ? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे,'' असे गोखले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com