नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ

नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचे भाषण सुरू असताना काही पालकांनी त्यांच्याशी बोलण्याची मागणी केली. "आठवीपर्यंत पास करायचा कायदा असताना सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेने बेकायदेशीरपणे नापास केले. विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना मध्यस्थी केली होती. परंतु शाळेने विद्यार्थ्यांना पुन्हा काढून टाकले." असे अनेक आरोप पालकांनी केले आहे.
नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ

पुणे : नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचे भाषण सुरू असताना काही पालकांनी त्यांच्याशी बोलण्याची मागणी केली. "आठवीपर्यंत पास करायचा कायदा असताना सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेने बेकायदेशीरपणे नापास केले. विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना मध्यस्थी केली होती. परंतु शाळेने विद्यार्थ्यांना पुन्हा काढून टाकले." असे अनेक आरोप पालकांनी केले आहे.

हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल एज्युकेशन प्रा. लि.च्या वतीने 'पढेगा भारत' हा कार्यक्रम झाला. यावेळी  ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, आशिष शेलार, अविनाश धर्माधिकारी,   राज्यसभा खासदार अमर साबळे, मेधा कुलकर्णी,  महा. राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अराफत शेख, राज्यसभा खासदार राकेश सिन्हा आदी उपस्थित होते. यावेळी काही पालकांनी कार्यक्रमात येऊन शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना  भेटण्याची विनंती केली. शिक्षण मंत्र्यांची भेट न झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. त्यासोबतच शेलार यांना अकरावी प्रवेशाबाबतच्या गोंधळाबाबत विचारले असता. त्यावरही ते हात जोडून निघून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com