आपली सत्ता गेलीय हे अजून फडणवीसांच्या पचनी पडलेले नाही :  पृथ्वीराज चव्हाण

देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भप्रेम हा देखावा आहे. आपल्या पाच वर्षाचे अपयश लपवण्यासाठी भाजप आरडाओरड करीत आहे.
pruthviraj-Chavan
pruthviraj-Chavan

नागपूर :  आपली सत्ता गेलीय हे अजून  देवेंद्र फडणवीसांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे ते कोणताही विषय नसताना आक्रमक पावित्रा घेत आहेत. विधानसभेचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे. 


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकार तयार होऊन काहीच दिवस झाले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भाच्या हिताची चर्चा सभागृहात होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भप्रेम हा देखावा आहे.  आपल्या पाच वर्षाचे अपयश लपवण्यासाठी भाजप आरडाओरड करीत आहे. 


पृथ्वीराज चव्हाण पुढे  म्हणाले की, फडणवीस सरकारने पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले? केंद्राला पत्र लिहिण्याशिवाय काही केले नाही. यामुळे विरोधकांना सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आरडाओरड करण्याचा नैतिक अधिकार नाही. पाच वर्षात 4 हजार 21 हजार कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. राज्याची तिजोरी देवेंद्र सरकारने रिकामी करून ठेवली. यामुळे विद्यमान सरकारला आपल्याकडे किती निधी आहे, याची माहिती घ्यावी लागत आहे. केवळ राजकीय मुद्दे मांडण्यासाठी आरडाओरड सुरू आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com