मतदारांनी भाजपचा सत्तेचा अहंकार उतरवला : पृथ्वीराज चव्हाण

prithviraj_chavan
prithviraj_chavan

कऱ्हाड :  महाराष्ट्रातील निकाल पाहता भाजपच्या विरोधी कौल दिला आहे. सत्तेचा गैरवापर, पैशाचा दुरुपयोग जनता सहन करीत नाही . जनतेला कुणी गृहीत धरु नये हाही संदेश राज्यातील जनतेने दिला आहे. त्यातुन भाजपच्या सत्तेचा अहंकारही जनतेने खाली उतरवला आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे भाजपला लगावला.

कऱ्हाड येथे आय़ोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार चव्हाण म्हणाले, भाजपने विरोधी पक्षाचे खासदार, आमदार यांना दहशत, चौकशीची भिती, पदाची लालच यासारख्या प्रकाराने प्रमुख नेत्यांना सक्तीचे पक्षांतर करायला लावले. त्याला सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थेतील मानणे बळी पडली. ज्यांनी पक्षांतर केले नाही ती विचाराची माणसे होते. अमित शहा काॅंग्रेसमुक्त महाराष्ट्र कलायला निघाले होते. पण हे महाराष्ट्रातील जनतेले माऩ्य झाले नाही. त्यामुळे भाजपच्या सत्तेचा अहंकारही जनतेने खाली उतरवला आहे.


 श्री. चव्हाण पुढे म्हणाले, निवडणुकीच्या निकालातुन वास्तव वेगळे पुढे आले आहे. सत्तेचा गैरवापर, पैशाचा दुरुपयोग याचा जनतेला गंभीर विचार करावा लागणार आहे. जनतेला कुणी गृहीत धरु नये हाही संदेश राज्यातील जनतेने दिला आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसला चांगली मते पडली आहे. काही जागा कमी मताने पराभुत झाल्या आहेत. पाच वर्षात या सरकारने एकही मोठे काम किंवा कारखाना आणलेला नाही. देशाची आर्थिक पत घसरु लागली आहे. त्यातून आर्थिक मंदी होवून बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com