विखे पाटील, क्षीरसागरांना मंत्री करणे हा फडणवीसांचा भ्रष्टाचारच; पृथ्वीराज चव्हाण

राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री करणे हे लाच व आमिष दाखवणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उघड उघड भ्रष्टाचार आहे., यासंदर्भात राज्यघटनेचे उल्लंघन झाल्याने याबाबत उद्या (ता. 24) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीही होईल. मुख्यमंत्र्यांना घटनेविषयी आदर असेल तर त्यांनी ताताडीने या दोघांनाही मंत्रीमंडळातून मुक्त करावे,'' असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
विखे पाटील, क्षीरसागरांना मंत्री करणे हा फडणवीसांचा भ्रष्टाचारच; पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री करणे हे लाच व आमिष दाखवणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उघड उघड भ्रष्टाचार आहे., यासंदर्भात राज्यघटनेचे उल्लंघन झाल्याने याबाबत उद्या (ता. 24) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीही होईल. मुख्यमंत्र्यांना घटनेविषयी आदर असेल तर त्यांनी ताताडीने या दोघांनाही मंत्रीमंडळातून मुक्त करावे,'' असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.

माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव आणि डॉ. गौरव बच्छाव यांच्या रुग्णालयाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते नाशिकला आले होते. यावेळी ते म्हणाले, ''पंतप्रधान अटलबिहारी वाजये यांच्या कार्यकाळात सध्यासारखी स्थिती निर्माण झाल्यास काय करावे याविषयी विचार झाला होता. त्याचा विचार करुन राज्यघटनेत 91 वी दुरुस्ती करण्यात आली. पक्षांतर विरोधी कायद्यातील ढोबळ नियमांपेक्षा हा वेगळा व अत्यंत तात्रीक स्वरुपाची विषय आहे. त्यादृष्टीने या दुरुस्तीत जर एखाद्या पक्षाच्या व्हीपनुसार, शिफारशीनुसार नियुक्ती झाली असेल तर त्या पदाचा राजीनामा देऊन पक्षांतर करणे अथवा मंत्रीपद स्विकारणे हा देखील गंभीर भ्रष्टाचारच ठरविण्यात आलेला आहे. लाच देण्याचाच हा प्रकार आहे. हा भ्रष्टाचार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासंदर्भात आम्ही त्यांना विधीमंडळात सुचीत केले असता 'मी कायेदशीर बाबी तपासून पाहिल्या आहेत.' असे त्यांनी सांगीतले. याचा अर्थ त्यांना सल्ला देणारे कायदेशीर तज्ञ कोण? हादेखील प्रश्‍न उपस्थित होतो," 

ते पुढे म्हणाले, ''यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर उद्या (ता.24) सुनावणी होत आहे. सुनावणीत काय होते हे मला सांगता येणार नाही. मात्र हा विषय गंभीर आहे. लाच देण्याचाच प्रकार आहे. हा भ्रष्टाचार खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केला आहे. त्यामुळे त्यांना याबाबत काहीही कारण पुढे करुन लपता येणार नाही.'' या दोन्ही मंत्र्यांना तात्काळ घरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. आपल्या मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी घटना दुरुस्तीची प्रत देखील सादर केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com