शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना मते फुटण्याच्या भीती

राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांकडे कोणताही पर्याय नसल्याने भाजपने पुढे केलेल्या रामनाथ कोविंद यांच्या नावाला समर्थन देणे हा सध्या सर्वोत्तम पर्याय आहे, असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. या निवडणुकीतील मतदानासाठी "व्हिप' लागू होत नसल्याने मते फुटण्याची भीती लक्षात घ्यायला हवी, असे उद्या (ता. 20) होणाऱ्या बैठकीत पक्षनेतृत्वाला सांगण्यात येणार असल्याचे समजते.
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना मते फुटण्याच्या भीती

मुंबई : राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांकडे कोणताही पर्याय नसल्याने भाजपने पुढे केलेल्या रामनाथ कोविंद यांच्या नावाला समर्थन देणे हा सध्या सर्वोत्तम पर्याय आहे, असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. या निवडणुकीतील मतदानासाठी "व्हिप' लागू होत नसल्याने मते फुटण्याची भीती लक्षात घ्यायला हवी, असे उद्या (ता. 20) होणाऱ्या बैठकीत पक्षनेतृत्वाला सांगण्यात येणार असल्याचे समजते.
 
शिवसेना स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळी भाषा तेवढी वापरते; पण शेवटी ते आमच्याच सोबत असतील, असा विश्‍वास भाजपमधून व्यक्‍त केला जात आहे. मात्र, त्याचवेळी शिवसेना शेतकरी आंदोलनात आग ओतण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा भाजपमधील एक गट करत आहे. तशी संतप्त भावना ज्येष्ठांपर्यंत पोहोचवली जात आहे.
 
शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजप राज्यातील सत्ता टिकवू शकतो, अल्पमतातील सरकार चालवणे किंवा शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील आमदार फोडणे केंद्रातील सत्तेमुळे भाजपला शक्‍य आहे. नव्या अवतारातील भाजपचे धोरण अत्यंत आक्रमक असल्याने आणि राष्ट्रपतिपदासाठी पर्यायी उमेदवार म्हणून नसल्याने शांत राहावे, असे मत शिवसेनेचे मंत्री आणि प्रमुख नेते खासगीत व्यक्‍त करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या धोरणाला कंटाळून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक झाल्यास मते फोडणाऱ्यांची व्युहरचना आखतील, अशी शिवसेनेला भीती आहे. भाजपने शिवसेनेचे 23 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे ठाम सांगण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराची कामे मंजूर करतात. त्यामुळे त्यांनी मनात आणल्यास या आमदारांच्या मतांची भर पडू शकते, असे मानले जाते. त्यामुळेच कोविंद यांच्या नावाला समर्थन द्यावे, असे काही ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुखांना सांगणार आहेत.
 
दरम्यान, शिवसेनेतील तळागाळातील कार्यकर्त्यांनी मात्र कर्जमाफीची मागणी लावून धरली तर शेतकरी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्‍वास आहे. मध्यावधी निवडणुकीत सरकारविरोधातील असंतोषाचा फायदा शिवसेनेला मिळू शकेल, असे कार्यकर्त्यांना वाटते. संपूर्ण कर्जमुक्‍ती हा आग्रह सत्तेपर्यंत नेवू शकेल, असे उद्धव यांना सांगण्यात येत असल्याचे समजते.

भाजपचा दावा
शिवसेना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देईल, असा भाजपला विश्‍वास आहे. यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com