महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार : नवनीत राणा 

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार : नवनीत राणा 

पुणे : महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी आज लोकसभेत केला. 

एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधत आंदोलन केले. केंद्राने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी करीत अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष वेधले आहे. शिवसेनेच्या मागणीवर राणा यांनी टीका केली.

राज्यातील शेतकऱ्यांनवर जे संकट आले आहे त्याला शिवसेनाच जबाबदार आहे. शिवसेनेमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट आल्याचा आरोपही त्यांनी केला. जर राष्ट्रपती राजवट नसती आणि महायुतीचे सरकार सत्तेवर आले असते तर शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यास मदत झाली असती असे राणा यांना म्हणायचे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवसेनेला त्यांनी कोणाच्या इशाऱ्यावरून लक्ष्य केले याचीही चर्चा सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com