महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू; राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी

राज्यात घटनात्मक तरतुदींनुसार सरकार स्थापन होऊ शकत नाही, याबद्दल खात्री पटली असल्याने राज्यात घटनेच्या कलम ३५६ कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली.
President of India Ramnath Kovind
President of India Ramnath Kovind

नवी दिल्ली : राज्यात घटनात्मक तरतुदींनुसार सरकार स्थापन होऊ शकत नाही, याबद्दल खात्री पटली असल्याने राज्यात घटनेच्या कलम ३५६ कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. 

सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने सरकार बनवण्यास असमर्थता दर्शवल्याने राज्यपालांनी शिवसेनेला पाचारण केले होते. मात्र, अपेक्षित असलेली काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याचे पत्रे शिवसेना सादर करु शकली नाहीत. त्यामुळे त्यांना मुदत नाकारत राज्यपालांनी राष्ट्रवादीला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने आज सकाळी राज्यपालांकडे दोन दिवसांची मुदत मागितली. 

अखेर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडली. केंद्रीय गृहखात्याने केलेल्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com