आमदारांनी शेतकऱ्यांनाच बळीचा बकरा केले :  प्रताप ढाकणे

जायकवाडी धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्यांनाच पाण्यावाचून वंचित ठेवले जात आहे.
आमदारांनी शेतकऱ्यांनाच बळीचा बकरा केले :  प्रताप ढाकणे

शेवगाव (नगर) : "जायकवाडी धरणावरील ताण असाच वाढत राहिला, तर शेवगाव तालुक्‍यातील शेतीचे वाळवंट होईल. वीजपुरवठा बंद ठेवून पाणी घेण्यापासून रोखले जात असूनही आमदारांनी कधी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज काढला नाही. विरोध करावा तर भाजपचे नेते नाराज होतील म्हणून त्यांनी शेतकऱ्यांनाच बळीचा बकरा होऊ दिले, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. प्रताप ढाकणे यांनी केली.

घोटण येथे प्रचारसभेत ढाकणे बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, अशोक मोटकर आदी प्रमुख उपस्थित होते.

ढाकणे म्हणाले, "घुले बंधूंनी तालुक्‍यातील विकासकामांत मोठे योगदान दिल्यानेच या परिसरात कामे होऊ शकली. मात्र, मागील पाच वर्षे भाजपच्या आमदारांनी केवळ विकासाच्या बाता मारल्या. 11 कोटींचा निधी आणल्याचा दावा करणाऱ्यांनी, तो निधी कुठे खर्च केला हे सिद्ध करावे. फक्त भावनिक वातावरणनिर्मिती करत त्यांच्याकडून स्वार्थी राजकारण सुरू असते. मागच्या निवडणुकीत अपघाताने आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. (स्व). मुंडे यांचे नाव निवडणुकीपुरते घ्यायचे; नंतर मात्र त्यांचा सोयीस्कर विसर पडतो. त्यांची नीती फक्त वापरा व फेकून द्या, अशीच राहिली आहे. अडचणीत आल्यावर आपण स्वत: त्यांना अनेकदा मदत केली, त्याचाही त्यांना विसर पडला आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत घुलेंनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. त्यांनाही त्यांच्याकडून त्रास दिला गेला.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com