नागपूर : विदर्भाच्या नातवानेच अखेर शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच सांगितले आहे की, त्यांच्या आजी अमरावतीच्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे काम विदर्भाच्या नातवाने केले आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधिमंडळात शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. याबाबत प्रतिक्रिया देताना प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, विदर्भाच्या पुत्राने आज सभात्याग केला असला तरी ते अपेक्षितच होते. विरोधक खो घालण्याचा प्रयत्न करणारच. कोणत्याही अटी, तटी, शर्ती न ठेवता उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली आहे.
ही तर सरकारची सुरवात आहे असे सांगून प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, सरकारने वचन दिलेले होते त्याची पूर्तता करण्यात येत आहे. मार्चपर्यंत समिती गठित करून ग्राउंड लेवलवर कर्जमाफीची अंमलबजावणी होईल.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे काम करीत आहेत असे विचारले असता त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्याच्या बोलण्या-वागण्यात शालीनता आणि विनम्रता दिसून येते. विरोधकांनी त्यांच्याकडून शिकायला हवे. विरोधकांनी विधानसभा निवडणुका निकालानंतर थोडी विनम्रता दाखवली असती तर ते आज सत्तेत असते आणि आम्ही विरोधी पक्षात असतो. तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.