भाजप चोरांचा पक्ष होतोय का : प्रकाश आंबेडकरांना पडलाय प्रश्न 

भाजप चोरांचा पक्ष होतोय का : प्रकाश आंबेडकरांना पडलाय प्रश्न 

पुणे : काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक लोकांना निवडणूक हरण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच अस्तित्त्व संपत आहे. यातील अनेक जण भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे भाजप हा चोरांचा पक्ष होतोय का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

पुण्यात वंचित बहुजन आघाडीचा आज सत्ता संपादन मेळावा आयोजित झाला. यावेळी विविध पक्षांच्या पदाधिकारयांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.यावेळी त्यांनी पत्रकारांना बरोबर बातचीत केली. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.

विधानसभा जागावाटपाबाबत काँग्रेससोबत दोन दिवसांत चर्चा करणार आहोत. आम्ही बाहेरच्यांचा विचार करणार नाहीत. आमच्या लोकांना आम्ही मोठं करणार आहोत. बाहेरून आलेल्या कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही, असे त्यांनी आज स्पष्ट केले. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भांडवलवादी पक्ष झाले आहेत. देशातील आरक्षण धोक्यात आहे. मेहबूब मुफ्ती यांचा वापर भाजपने केला आणि काश्मीर ताब्यात घेतले. टू जी घोटाळा झाला तेव्हा सर्वांनी आवाज उठवला होता जेव्हा यातील आरोपी सोडले तेव्हा अण्णा हजारे झोपले हो, असा प्रश्न त्यांनी विचारला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com