आणि आमदार प्रकाश सोळंकेंना अश्रू आवरले नाहीत...

विधानसभा निवडणुकीत विजयानंतर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात प्रथमच आमदार प्रकाश सोळंके सार्वजनिक कार्यक्रमात आले होते.
आणि आमदार प्रकाश सोळंकेंना अश्रू आवरले नाहीत...

माजलगांव : निवडणुकीत स्थानिक उमेदवार आणि शेवटची निवडणूक अशी भावनिक साद घालणाऱ्या प्रकाश सोळंके यांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातल्याने प्रथमच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात आलेल्या प्रकाश सोळंके यांना अश्रू आवरले नाहीत. व्यासपीठावर बोलण्यासाठी उभारल्यानंतर त्यांनी आनंदाश्रुंना वाट मोकळी करुन दिली. 

माजलगाव मतदार संघातून प्रकाश सोळंके राष्ट्रवादीकडून विजयी झाले. विजयानंतर ते सुरुवातीला पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी मुंबईत होते. नंतर सरकार स्थापनेच्या विचार विनिमय बैठकांसाठी मुंबईत होते. रविवारी पहिल्यांदाच प्रकाश सोळंके हे ते स्वत: अध्यक्ष असलेल्या लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यावर बॉयलर अग्निप्रदीपनाच्या जाहीर कार्यक्रमात आले. यावेळी मतदार व उस उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना त्यांनी आनंदाश्रुंना वाट मोकळी करुन दिली. 

अटीतटीच्या निवडणुकीत आमदार प्रकाश सोळंके यांनी शेवटची निवडणुक आणि स्थानिक उमेदवार अशी भावनिक साद मतदारांना घातली होती. मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि 12 हजारांवर मतांनी सोळंके विजयी झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com